घरक्राइमबैलाच्या गळ्याभोवती दोर आवळून केलं ठार

बैलाच्या गळ्याभोवती दोर आवळून केलं ठार

Subscribe

गोठ्यात बांधलेल्या एका बैलाला गळफास देऊन क्रूरतेने हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे.

केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीला स्फोटकं खायला दिल्यानंतर, कुत्र्याच्या तोंडाला घट्ट टेप बांधणे, गायीला फटाके खायला देणं अशा घटना एकामागून एक पुढे येत आहेत. त्यानंतर आता अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. गोठ्यात बांधलेल्या एका अडीच वर्षाच्या बैलाला एका अज्ञात व्यक्तीने गळफास देऊन ठार मारले आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गावात शेतकरी संदीप तोत्रे राहत असून त्यांनी पंढरपूर येथून खिलार जातीचे दीड वर्षाचे वासरु विकत आणले होते. त्याला चांगला खुराक दिल्याने बैल चांगला तरबेज आणि रुबाबदार दिसत होता. या बैलाला पाहून अनेकांनी चांगली किंमत देऊन खरेदी करण्याची तयारी दाखवली. मात्र, संदिप तोत्रे यांनी बैलाची विक्री केली नाही.

- Advertisement -

दरम्यान, १६ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास तोत्रे कुटुंब झोपण्यास गेले. सकाळी उठून गोठ्यात गेल्यावर त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. रात्रीच्या सुमारास कोणीतरी गोठ्यातील खांबाला रस्सीच्या सहाय्याने बैलाला क्रुरपणे गळफास देऊन ठार मारले होते. मात्र, तोत्रे यांनी याप्रकरणी कोणावरही संशय व्यक्त केला नाही. बैलाच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि संतापाची लाट पसरली आहे. संदीप तोत्रे यांनी याप्रकरणी मंचर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. अशा क्रूरतेने प्राण्यांची हत्या करणाऱ्या आरोपीला तातडीने अटक करुन कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.


हेही वाचा – मालाड: विनयभंग करणाऱ्या आरोपीला नऊ वर्षात केले १२ वेळा अटक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -