आज राज्यात ६ हजार२९० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील कोरोनारूग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे ९२.४९टक्के इतके झाले आहे. राज्यात आत्तापर्यत एकूण १६ लाख९१ हजार४१२ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात रिकव्हरी रेट अधिक असला तरी आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रूग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ९५ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८टक्के इतका आहे.
- Advertisement -
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १कोटी ९लाख १५ हजार ६८३ प्रयोगशाळा नमुन्यापैकी १८ लाख २८ हजार ८२६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ५ लाख ३८ हजार ८४ व्यक्ती या होमक्वारंटाईन आहेत. तर ६ हजार४२० व्यक्ती या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.