उत्तर प्रदेशमध्ये अनेक धक्कादायक घटना घडत असतात. लग्नाच्या रात्रीच नवरा घरातून पळून गेल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरा अचानक गायब झाल्याने नवरीला धक्का बसला आहे. नवरीने रडून रडून स्वत:ची वाईट हालत करून घेतली आहे. २४ तासानंतरही नवरा घरी परत आला नसल्याने कुटुंबियांनी याविषयी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस अचानक गायब झाले झालेल्या नवऱ्याचा तपास करत आहेत. लग्नाला काही तास होत नाहीत तोवर नवरा लग्नघरातून गायब झाल्याने कुटुंबामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशच्या बिलसंडा पोलीस स्टेशनच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. सिसैइया गावात राहणाऱ्या लोकेंद्र यादव हा गावाचा प्रमुख होता. ९ डिसेंबरला लोकेंद्रचे लग्न झाले. दोन्ही कुटुंब , मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्या हजेरीत लोकेंद्रचा विवाह सोहळा पार पडला. मोठ्या धामधुमीत लग्नाची वरात काढण्यात आली. साग्रसंगित लग्नसोहळा पार पाडल्यानंतर लोकेंद्र १० डिसेंबर आपल्या नव वधुसोबत घरी आला. घरी येताच काही वेळाने लोकेंद्र घरातून गायब झाल्याने एकच खळबळ उडाली.
लोकेंद्रची वरात घरी पोहल्यानंतर त्याला दोन व्यक्तींचा फोन आला. फोन आल्यानंतर तो फोन वर बोलण्यासाठी घराच्या बाहेर आला. घराच्या बाहेर फोनवर बोलत असलेला लोकेंद्र काही वेळाने घरात परतलाच नाही. नवरा घरात नसल्याचे समजात कुटुंबियांनी त्याचा शोध घ्यायला सुरूवात केली. कुटुंबिय आणि नातेवाईकांनी रात्रभर लोकेंद्रची शोधाशोध केली. तरीही लोकेंद्रचा काही शोध लागला नाही. शेवटी कुटुंबियांनी घटनेची पोलिसात तक्रार दाखल केली. लोकेंद्र शेवटी कोणाच्या संपर्कात आला होता त्याचबरोबर तो शेवटचे कोणाशी फोनवर बोलत होता याचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा – नवजात अर्भक कचराकुंडीत फेकून मावशीने काढला पळ