घरट्रेंडिंगइराणमधील २३६ भारतीय मायेदशी परतले!

इराणमधील २३६ भारतीय मायेदशी परतले!

Subscribe

चीनमध्ये हाहा:कार माजविण्यारा करोनाची दहशत जगभरात पसरली आहे. करोनाने देशात शिरकाव केला असून आतापर्यंत देशात ७४ जण करोनाबाधित आहेत. तर राज्यात १४ करोनाग्रस्त आहेत. हे सर्व परदेशातून आले होते. इराणमध्ये ६००० भारतीय अडकले होते. इराणमध्ये जोरात करोनाचा फैलाव होत आहे. यामध्ये १,१०० महाराष्ट्राचे आहेत. इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परतायचं होतं. २३६ भारतीयांना मायेदशी आणण्यात आलं आहे. २३६ जणांमध्ये १३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्वांना विमानतळाहून थेट वेगळ्या कक्षात घेऊन जाण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जय शंकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

- Advertisement -

शुक्रवारी ४४ प्रवाशांना इराणहून भारतात आणलं गेलं. त्यानंतर आतापर्यंत एकूण २३६ भारतीयांना इराणहून भारतात आणण्यात आलं आहे. यासाठी जयशंकर यांनी इराण सरकार आणि भारतीय दुतावासाचे आभारही मानले आहेत. इराणमध्ये करोना व्हायरसमुळे १०० जणांचा मृत्यू झाला. यामुळे इराणमधील भारतीयांना तातडीने भारतात आणण्यात आले.

राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या १४ वर पोहोचली आहे. पुण्यामध्ये ९, मुंबईत ३, ठाण्यात १ आणि नागपुरात १ रुग्ण आहे. अमेरिकेहून नागपुरमध्ये दाखल झालेल्या व्यक्तिची वैद्यकिय चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये करोना पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले. करोनाच्या पार्श्वभूमीवर १० लाख ५७ हजार लोकांचे विमानतळावर स्क्रिनिंग करण्यात आले आहे. जगभरात करोना फोफावला असून ४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा- करोना चाचणीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपोर्ट आला…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -