एकीकडे कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असताना दुसरीकडे पाकिस्तानाकडून खुरापती सुरुच असल्याचे समोर आले आहे. जम्मू काश्मिरमधील शोपिंया येथे भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
३ भारतीय नागरिकांचा मृत्यू
पुंछमध्ये शुक्रवारी रात्री तीन भारतीय नागरिकांचा चकमकीत मृत्यू झाला आहे. पाकिस्तानने पुंछ जिल्ह्यात गुलपूर सेक्टक आणि खरी करमाडा भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. पती-पत्नी आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. तर भारतीय लष्करानेही पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रात्री उशिरापर्यंत हा गोळीबार सुरू होता, अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा – देशात कोरोनाचा कहर; २४ तासांत ३४ हजार ८८४ नवे रुग्ण, ६७१ रुग्णांचा मृत्यू