देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात मागील २४ तासांत ३७ हजार ७२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६४८ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ११ लाख ९२ हजार ९१५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २८ हजार ७३२ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ५३ हजार ५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ४ लाख ११ हजार १३३ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
Spike of 37,724 cases and 648 deaths reported in India in the last 24 hours.
Total #COVID19 positive cases stand at 11,92,915 including 411133 active cases, 7,53,050 cured/discharged/migrated and 28,732 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/U1M6Wdqqyw
— ANI (@ANI) July 22, 2020
२१ जुलै पर्यंत देशात १ कोटी ४७ लाख २४ हजार ५४६ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी मंगळवारी ३ लाख ४३ हजार २४३ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या असल्याची माहिती भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदने (ICMR) दिली आहे.
Total number of samples tested up to 21st July is 1,47,24, 546 including 3,43,243 samples tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR)#COVID19 pic.twitter.com/jGWJlCMc5F
— ANI (@ANI) July 22, 2020
देशात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यानंतर तामिळनाडूत, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडून आणि दिल्ली या तीन राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १ लाखांच्या पुढे आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख २७ हजार ३१, तामिळनाडूतील १ लाख ८० हाजर ६४३ आणि दिल्लीतील १ लाख २५ हजार ९६वर पोहोचली आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटकमध्ये कोरोनाच्या बळींची संख्या जास्त आहे.
हेही वाचा – Corona: कोरोनामुळे भाजप आमदाराचा मृत्यू