देशात कोरोना दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. जरी नव्या कोरोनाबाधितांची संख्येत घट होताना दिसत असली तरी मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ५७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले असून यापैकी २ लाख ८७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ कोटी २३ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ३२ लाख ३३ हजारांहून अधिक जणांवर अद्याप उपचार सुरू आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या परिषदेद्वारे एक चिंता व्यक्त करण्यात आली ती म्हणजे भारतात ५० टक्के लोकं मास्क घालत नाही आहेत. फक्त ७ टक्के लोकं व्यवस्थितरित्या मास्क घालत आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २५ शहरांमध्ये अभ्यास केला आहे.
Half of India isn't wearing a mask!
Around 50% Indians do not wear a #Mask today, only 7% wear it correctly
– @MoHFW_INDIA quotes a study conducted in 25 cities #Unite2FightCorona #StaySafe pic.twitter.com/f85gvG1noQ
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) May 20, 2021
केलेल्या अभ्यासातून असे समोर आले की, ६४ टक्के लोकं तोंड झाकून घेतात पण नाक नाही. २० टक्के लोकांचा मास्क अनुवटीवर असतो. तर २ टक्के लोकांचा मास्क मानेवर असतो आणि १४ टक्के लोकं व्यवस्थित मास्क घालत आहेत. त्याचा मास्क नाका, तोंडावर असून त्याच्या मास्कला नाकावरचा क्लिप आहे.
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत ५० टक्के लोकांचा मृत्यू ५ राज्यामध्ये झालेला आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्लीचा समावेश आहे.
2,76,110 daily new cases were registered in the last 24 hours
50% of fatalities in the last 24 hours were reported from 5 States – Maharashtra, Karnataka, Tamil Nadu, UP and Delhi- Joint Secretary, @MoHFW_INDIA pic.twitter.com/g1O4HYdi8W
— PIB India (@PIB_India) May 20, 2021
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात २४ तासांत २ लाख ७६ हजारांहून अधिक नवे कोरोना रूग्ण आढळले असून एका दिवसात ३ हजार ८७४ जणांच्या मृत्यूची विक्रमी नोंद झाली आहे. तर ३ लाख ६९ हजार ०७७ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा – Black Fungus नंतर आता जास्त धोकादायक White Fungus; जाणून घ्या या आजाराबाबत