घरदेश-विदेशमार्च अखेरपर्यंत एअर इंडिया, भारत पेट्रोलियम विकणार : अर्थमंत्री

मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया, भारत पेट्रोलियम विकणार : अर्थमंत्री

Subscribe

मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या दोन्ही कंपन्या विकरणार आहेत, असे विधान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केले आहे.

मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या दोन्ही कंपन्या विकणार असल्याचे सर्वात मोठे विधान अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केले आहे. दरम्यान, एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, असे सरकारला वाटत असून मार्च अखेर पर्यंत या दोन्ही कंपन्यांची विक्री करण्याचा विचार सरकार करत असल्याचे विधान निर्मला सितारमण यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

काय म्हणाल्या निर्मला सितारमण?

सितारमण यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. मार्च महिन्या अखेरपर्यंत एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे त्यांनी म्हटले आहे. ‘चालू आर्थिक वर्षात करसंकलनात झालेली घट पाहून निर्गुंतवणूक आणि धोरणात्मक विक्रीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह असल्याचेही सितारमण यांनी सांगितले आहे. आर्थिक मंदीचे मळभ दूर करण्यासाठी वेळेवर आवश्यक पावले उचलण्यात आली असून अनेक क्षेत्र या मंदीतून सावरत आहेत. आपलं ताळेबंद सुधारा, असे अनेक उद्योगांच्या मालकांना सांगण्यात आले असून, त्यातील अनेकांनी नवी गुंतवणूक करण्याची तयारी सुरु केली आहे’, असे देखील त्या पुढे म्हणाल्या.

- Advertisement -

हेही वाचा – ‘शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवू नये’; राऊतांचा फडणवीसांना टोला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -