विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि कॉंग्रेस नेते एकमेकांवर टीका करत आहेत. राहुल गांधी आपल्या भाषणामध्ये नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत असता. गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत सरकारवर टीका करत असतात. आता हाच मुद्दा घेऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहेत. ते म्हणाले की, राहुल गांधी एवढे शेतकऱ्यांच्या मुद्यांवर बोलत असतात. पण, राहुल गांधी यांनी आपल्या आतापर्यंतच्या हयातीत बैल तरी जुंपले आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. आता यावर राहुल गांधी यांची काय प्रतिक्रिया असेल, यावर सगळ्यांचे लक्ष आहे.
हेही वाचा – राहुल गांधी यांना मोदी फोबिया झालाय – शाह
नेमकं काय म्हणाले अमित शहा?
अमित शहा यांची आज मध्य प्रदेशच्या बालाघाट या ठिकाणी प्रचारसभेत बोलताना राहुल गांधींवर टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची टीका करत असतात. शेतीतले राहुल गांधींना काय कळते, त्यांनी कधी बैलगाडी तरी कधी जुंपली आहे का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एवढा आवाज उठवत आहात मग कॉंग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना युरिया मिळवण्यासाठी लाठ्या का खाव्या लागल्या असाही प्रश्न अमित शहा यांनी केला आहे.
Rahul baba kisaan-kisaan karte hain. Kya rahul baba ne kabhi 2 bael (ox) bhi jote hain? Aapke samaye mein kisaano ko urea ke liye lathi khani padti thi: BJP President Amit Shah in Balaghat #MadhyaPradeshElections2018 pic.twitter.com/Fr2qZYKF2p
— ANI (@ANI) November 23, 2018
हेही वाचा – हे भाजपाच्या परंपरेला साजेसचं – राहुल गांधी