घरताज्या घडामोडीकृषी कायदे : सुप्रीम कोर्टाच्या समितीचा अहवाल जाहीर करा, अनिल घनवट यांची...

कृषी कायदे : सुप्रीम कोर्टाच्या समितीचा अहवाल जाहीर करा, अनिल घनवट यांची मागणी

Subscribe

नवी दिल्ली –  केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, संसदेत प्रक्रिया पार पडेपर्यंत शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणाहून हटणार नसल्याची भूमिका राकेश टिकैत यांनी घेतली. त्यापाठोपाठ आता यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीतील एक सदस्य अनिल घनवट यांनी या कायद्यांसंदर्भात या समितीने कोर्टाला सादर केलेला अहवाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी सुप्रीम कोर्टाकडे पत्राद्वारे केली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १२ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने तीन कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर स्थगिती आणत या समस्येवर समितीची नियुक्ती केली होती. या समितीने या पूर्ण समस्येवर १३ मार्च रोजी न्यायालयाला आपला अहवाल सादर केला. मात्र, अद्याप हा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, समितीमधील एक सदस्य अनिल घनवट यांनी हा अहवाल जाहीर करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता त्या अहवालाचा संदर्भ राहिलेला नाही. पण या अहवालामध्ये शेतकर्‍यांच्या समस्यांसंदर्भात अनेक शिफारशी आहेत, ज्या व्यापक हितासाठी महत्वाच्या आहेत, असे घनवट यांनी सर्वोच्च न्यायालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

या पत्रामध्ये घनवट यांनी शेतीसंदर्भात व्यापक धोरण राबवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला द्यावेत, अशी देखील विनंती केली आहे. आपल्याला असे धोरण राबवण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे शेतकर्‍यांचे हित जोपासले जाईल आणि बाजारावर त्याचा परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा घनवट यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -