उत्तर प्रदेश निवडणूक तोंडावर आल्या असताना एआयएमआयएमचे (AIMIM ) नेते असदुद्दीन ओवेसींचा (Asaduddin Owaisi) एक खळबळजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कानपूर रॅली वेळी असदुद्दीन ओवेसींनी पोलिसांना धमकी दिली. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून भाजपने ओवेसींवर हल्लाबोल केला आहे. कानपूर रॅलीवेळी ओवेसींनी पोलिसांना धमकी देत म्हटले होते की, ‘आम्ही मुसलमान तुम्ही केलेला अन्याय कधीही विसरणार नाही. तुम्ही आमच्यावर केलेला अन्याय कायम लक्षात राहिल आणि अल्लाह त्याच्या ताकदीने सगळे निस्तनाबूद करेल’. ओवेसींनी या धमकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी यांचे नाव घेत म्हटले की, ‘हे दोघे जेव्हा नसतील तेव्हा तुम्हाला कोण वाचवायला येईल’. ओवेसींच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय म्हणाले ओवेसी?
कानपूर रॅलीमध्ये ओवेसींनी म्हटले, ‘मी पोलिसांना सांगू इच्छितो ती बाब तुम्ही लक्षात ठेवा, मुख्यमंत्री योगी आदित्य कायम मुख्यमंत्री नसतील मोदीही कायम पंतप्रधान राहणार नाहीत. मुसलमानांची ही वेळ नाहीये म्हणून ते शांत आहेत. पण लक्षात ठेवा तुम्ही केलेल्या अन्यायाचा आम्हाला विसर पडलेला नाही. तुम्ही केलेला अन्याय आम्ही लक्षात ठेवू. अल्लाह त्याच्या शक्तीने सगळ निस्तनाबूत करेल. आम्ही लक्षात ठेवू, परिस्थिती बदलेल. जेव्हा योगी आपल्या मठात जातील आणि मोदी शिखरांवर निघून जातील तेव्हा तुम्हाला वाचवायला कोण येईल?’
ओवेसेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपने ओवेसींवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी ओवेसींवर ट्विट करत निशाणा साधलाय. ‘ओवेसेंनी असा विचार करू नये की हा १९२१चा भारत आहे. जिथे सोहरावर्दी आणि जिन्ना सारख्या विचारसरणीला निर्दयीपणे चिरडले जाईल. मोदी आणि योगी कुठेही जाणार नाहीत हे तुम्ही लवकर लक्षात घेतले तर बरे होईल. हा नवीन भारत आहे. इथे सापाला दुध पाजले जात नाही तर त्यांचा फणा ठेचला जातो’, असा टोला भाजप नेते कपिल शर्मा यांनी लगावला आहे.
कौन तुम्हें बचाने आएँगे?
मठ हो ..
या पहाड़ हो ..
वहीं से तो महादेव आएँगे …जिन्हें तुम मरना चाहते हो
चन्द्रशेखर उनके ढाल बन जाएँगे …हर हर महादेव॥ pic.twitter.com/1okRYN0VE6
— Sambit Patra (@sambitswaraj) December 23, 2021
तर भाजप नेते संबित पात्र यांनी ही ओवेसींवर हल्लाबोल केला आहे. ‘जेव्हा जेव्हा या भूमिवर औरंगजेब आणि बाबर येईल तेव्हा तेव्हा मातृभूमीतून कोणी ना कोणी शिवाजी महाराज, महाराणा प्रताप बनून मोदी योगींसारखे उभे राहतील. आम्ही कधीही मुघलांना घाबरलो नाही आणि कधीही घाबरणार नाही’, असे संबित पात्र यांनी म्हटले. तुम्हाला कोण वाचवणार ओवेसींच्या या प्रश्नावर उत्तर दिले ‘शिखरावर गेले तर ज्यांना तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करत आहात ते महादेव आम्हाला वाचवायला येतील तर चंद्रशेखर त्यांची ढाल बनतील’, असे पात्रा यांनी म्हटले.
हेही वाचा – अफगाणिस्तानवर तालिबानच्या सत्तेनंतर महिला पत्रकारांवर उपासमारीची वेळ