-
अटलबिहारी वाजपेयी हे सर्वाधिक काळ हयात असलेले माजी भारतीय पंतप्रधान होते
-
एक उत्तम कवी, पत्रकार, प्रक्वते म्हणूनही लोकप्रिय. देशभरात त्यांचं काव्य प्रसिद्ध आहे.
-
‘पद्मविभूषण’ आणि ‘भारतरत्न’ या पुरस्कारांनी वाजपेयी सन्मानित
-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रति (RSS) वाजपेयींची निस्सिम श्रद्धा होती
-
१९५५ साली लढवलेली पहिली निवडणूक अटलजी हरले होते. त्यानंतर ते १९५७ मध्ये त्यांनी बलरामपूर आणि लखनऊमधूनक लढवली मात्र तीही निवडणूक ते हरले.
-
मात्र, त्यानंतर बलरामपुर इथे झालेल्या निवडणुकीत ते जिंकले आणि पहिल्यांदा खासदार बनले.
-
‘पत्रकारितेमध्येच पुढे करिअर करायचं होतं पण चुकून राजकारणात आलो’, असं वाजपेयी एका मुलाखतीत म्हणाले होते.
-
पंडित जवाहरलाल नेहरु यांना वाजपेयींच्या भाषण कौशल्याचं कायम अप्रूप होतं. वाजपेयी एक दिवस देशाचे पंतप्रधान बनणार, अशी खात्री नेहरुंना होती
-
१९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या दरम्यान वाजपेयींनी २३ दिवसांचा कारावास भोगला होता
-
१९६८ मध्ये दीनदयाल उपाध्याय यांच्या निधनानंतर अटलजी भारतीय जन संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले. १९७७ साली जन संघाचे नाव बदलून भारतीय जनता पार्टी करण्यात आले
- Advertisement -
-
१९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताचा विजय झाला. या विजयानंतर लोक वाजपेयींना एक प्रभावी नेता आणि वाजपेयी सरकारला शक्तीशाली सरकार समजू लागले
-
२००१ मध्ये वाजपेयींनी ‘सर्व शिक्षा अभियाना’ची सुरुवात केली
-
२००२ सालच्या गुजरात दंगलीदरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्म पाळण्याचा सल्ला दिला होता.
-
दिल्ली – लाहोर बससेवा वाजपेयींनी सुरु केली होती
-
अन्य पक्षांचे वरिष्ठ नेते वाजपेयींना खूप मानायचे. वेळोवेळी ते वाजपेयींकडून राजकीय सल्ले घेत असत
-
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेमध्ये ‘हिंदी’ भाषेत बोलणारे वाजपयी पहिले परराष्ट्रमंत्री होते