घरक्राइमएका चहावालीवर 4 वयस्करांचं जडलं प्रेम, पाचव्याने केलं प्रपोज आणि...

एका चहावालीवर 4 वयस्करांचं जडलं प्रेम, पाचव्याने केलं प्रपोज आणि…

Subscribe

बिहारमधून एक 'अजब प्रेम की गजब कहानी' समोर आली आहे. एका विधवा चहावालीवर पाच वयस्करांचं प्रेम अशी ही प्रेम कहाणी आहे. बिहारमध्ये एक विधवा महिला चहाची विक्री करत होती. त्यावेळी तिच्या चहाच्या टपरीवर दररोज चहा पिण्यासाठी येणाऱ्या चार जणांचे तिच्यावर प्रेम जडलं होतं. विशेष म्हणजे हे चारही जण आणि ती चहावाली महिला सामंजस्याने प्रेमसंबंधात राहत होते. अशातच आणखी एका व्यक्तीला ती महिला पसंत असल्याने त्याने थेट तिला प्रपोज केले आणि तिनेही त्याच्याशी प्रेमविवाह करण्याला होकार दिला.

बिहारमधून एक ‘अजब प्रेम की गजब कहानी’ समोर आली आहे. एका विधवा चहावालीवर पाच वयस्करांचं प्रेम अशी ही प्रेम कहाणी आहे. बिहारमध्ये एक विधवा महिला चहाची विक्री करत होती. त्यावेळी तिच्या चहाच्या टपरीवर दररोज चहा पिण्यासाठी येणाऱ्या चार जणांचे तिच्यावर प्रेम जडलं होतं. विशेष म्हणजे हे चारही जण आणि ती चहावाली महिला सामंजस्याने प्रेमसंबंधात राहत होते. अशातच आणखी एका व्यक्तीला ती महिला पसंत असल्याने त्याने थेट तिला प्रपोज केले आणि तिनेही त्याच्याशी प्रेमविवाह करण्याला होकार दिला. पण त्यावेळी आपल्या नात्यात पाचवा आल्याने आणि प्रेमात कमतरता भासू लागल्याने त्या चौघांनी पाचव्याचा काटा काढत त्याची थेट हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय चहा विक्रेती पिनो देवी, 75 वर्षीय कृष्णंदन प्रसाद, 60 वर्षीय सूर्यमणी कुमार, लोहा सिंग आणि वासुदेव पासवान यांना अटक केली आहे.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

बिहारमध्ये ३० वर्षीय विधवा महिला चहाची विक्री करत होती. त्यावेळी तिच्या चाहाच्या स्टॉलवर अनेक जण दररोज चहा पिण्यासाठी येत असत. अशातच यामधील चार वयस्करांचे म्हणजेच साठी गाठलेल्यांचे त्या विधवा महिलेवर प्रेम जडले. त्या महिलेचेही त्यांच्याशी प्रेमसंबंध होते. हे चारही जण सामंजस्याने तिच्यावर प्रेम करत होते. त्याचवेळी अचानक एका पाचव्या व्यक्तीला ती विधवा महिला आवडू लागली आणि त्याने थेट तिला विवाहाची मागणी घातली. त्यानंतर त्या महिलेनेही प्रेमविवाह करण्यास त्या पाचव्या व्यक्तीला होकार दिला. त्रिपित शर्मा (75) असे त्या वक्तीचे नाव आहे.

अचानक आपल्या प्रेमात बाहेरचा व्यक्ती आल्याने त्या चार जणांच्या भावना दुखावल्या आणि त्यांनी त्याचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. कारण या व्यक्तीचे त्या महिलेच्या घरी जाणे-येणे वाढले होते. त्यामुळे संतापलेल्या चार जणांनी आपापसात बातचीत करून त्या महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या महिलेने तुम्हीच काय ते करा असे सांगितले. तिच्या सांगण्यावरून चार जणांनी त्या पाचव्या व्यक्तीला एका अनोळख्या ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले आणि त्याला या नात्यातून बाहेर जाण्यास सांगितले.

- Advertisement -

मात्र, पाचव्या व्यक्तीचे त्या महिलेवर प्रेम जडले असल्याने आणि विशेष म्हणजे त्या महिलेनेही त्या दोघांच्या प्रेमविवाहाला होकार दिल्याने त्याने यामधून बाहेर पडण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या चार जणांपैकी एकाने त्याची जागीच हत्या केली. हत्येनंतर त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून त्यांनी तेथून पळ काढला.

त्यानंतर दोन दिवस त्रिपित शर्मा घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत त्याची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. सुरूवातील पोलिसांना काहीच धागेदोरे सापडले नाहीत. मात्र, काही दिवसांनी त्या महिलेने तिच्याकडे असलेला त्रिपित शर्माचा मोबाईल सुरू केला. त्यामुळे पोलिसांनी त्याचे लोकेशन मिळाले आणि घटनेचा उलघडा झाला. पोलिसांनी त्या चहावालीकडून त्रिपित शर्माचा मोबाईल घेत तिची चौकशी केली. या चौकशीवेळी हत्येची संपूर्ण कहाणी समोर आली आहे.


हेही वाचा – आरोग्यमंत्री दाखवा व एक लाख रुपये मिळवा, ठाकरे गटाचा तानाजी सावंतांवर निशाणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -