घरताज्या घडामोडीगंगा नदीत बोट उलटून 6 जण बेपत्ता, 15 जणांना वाचवण्यात यश

गंगा नदीत बोट उलटून 6 जण बेपत्ता, 15 जणांना वाचवण्यात यश

Subscribe

बिहारची राजधानी पाटणा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी सकाळी गंगा नदीत एक बोट उलटून 6 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या बोटीत एकूण 21 जण होते. त्यापैकी 15 जणांची स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने सुटका करण्यात आली.

बिहारची राजधानी पाटणा येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रविवारी सकाळी गंगा नदीत एक बोट उलटून 6 जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. या बोटीत एकूण 21 जण होते. त्यापैकी 15 जणांची स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने सुटका करण्यात आली. तर 6 जण बेपत्ता आहेत. जीवरक्षकांचे पथक त्याचा शोध घेत आहे. (bihar boat capsizes in ganga river in patna six people missing 15 rescued)

दिघा येथील जेपी सेतूच्या 10 क्रमांकाच्या खांबाजवळ हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती एसडीआरएफ टीमला देण्यात आली आहे. त्यानंतर पोलीस कर्मचारी आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट पुलाच्या पिलरला धडकली, त्यानंतर हा अपघात झाला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7 वाजता हा अपघात झाला. बोट उलटताना पाहून नागरिकांना वाचवण्यासाठी बोटीसह नदीवर गेलो आणि जमेल तेवढ्या लोकांना वाचवले. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एसडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे.

सध्या स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. गंगेच्या पाण्याची पातळी जास्त असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. गंगाजल घेण्यासाठी 12 ते 13 जण बोटीवर बसले होते. स्थानिक लोकांच्या मदतीने दुसऱ्या बोटीतून त्यांची सुटका करण्यात आली. त्याच बोटीतून काहीजण वाळूची वाहतूक करत होते. बोट खांबाला धडकल्यावर पोहायला जाणणाऱ्या 7 ते 8 जणांनी स्वतः उडी मारून पळ काढला. पोलिसांच्या भीतीने त्यांनी नदीच्या पलीकडे धाव घेतली.

- Advertisement -

यापूर्वी बिहारमधील कटिहारमध्ये अशीच एक घटना घडली होती. येथे बोट उलटल्याने 10 जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला होता. त्याचवेळी 3 जणांना वाचवण्यात यश आले. येथे मोबाईल नदीत पडल्याने हा अपघात झाला. पाण्यात पडलेला मोबाईल पाहण्यासाठी मुलाने बोटीतून झुकले असता रुडर चालवत असलेल्या आजोबांनी नदीत उडी घेतली, त्यामुळे बोटीचा तोल गेला आणि बोट उलटली.


हेही वाचा – सरकार उत्सवमग्न, त्यांच्याकडे भावनांचा दुष्काळ; उद्धव ठाकरेंनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -