चीनच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहे. मात्र, आता भाजपने कॉंग्रेसवर हल्लाबोल केला आहे. राजीव गांधी फाउंडेशनला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (पीएमएनआरएफ) पैसे देण्यात आल्याचा आरोप शुक्रवारी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला. शिवाय, त्यांनी राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून निधी आल्याचा आरोप केला आहे.
“पीएमएनआरएफ, जो फंड संकटात लोकांना मदत करण्यासाठी बनवला होता, त्या फंडातून यूपीएच्या कार्यकाळात राजीव गांधी फाउंडेशनला पैशाची देणगी दिली जात होती. पीएमएनआरएफ बोर्डात कोण बसला आहे? सोनिया गांधी.
राजीव गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष कोण आहेत? सोनिया गांधी. हे पूर्णपणे निंदनीय आहे,” असं जेपी नड्डा म्हणाले.
One family’s hunger for wealth has cost the nation immensely. If only they have devoted their energies towards more constructive agenda.
The Congress’ Imperial Dynasty needs to apologise to the unchecked loot for self-gains!
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 26, 2020
PMNRF, meant to help people in distress, was donating money to Rajiv Gandhi Foundation in UPA years.
Who sat on the PMNRF board? Smt. Sonia Gandhi
Who chairs RGF? Smt. Sonia Gandhi.
Totally reprehensible, disregarding ethics, processes and not bothering about transparency. pic.twitter.com/tttDP4S6bY
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) June 26, 2020
आज ही मैंने टेलीविजन में देखा और दंग हूं कि राजीव गांधी फाउंडेशन को 2005-06 में people’s republic of china और चाइनीज एंबेसी ने मोटी रकम राजीव गांधी फाउंडेशन को दिया।
ये है चाइना और कांग्रस का गुपचुप रिश्ता: श्री @JPNadda #ChineseGandhis #BJPJanSamvad pic.twitter.com/TGbgwXAZwk
— BJP (@BJP4India) June 25, 2020
हेही वाचा – पडळकरांचं विधान भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना?; ‘सामना’तून सवाल
जेपी नड्डा म्हणाले, “भारतीय लोकांनी कष्टाची कमाई पीएमएनआरएफला गरिबांच्या मदतीसाठी दान केली. कुटुंब चालवण्याच्या पायाभरणीत या सार्वजनिक पैशाचा उपयोग करणे ही केवळ एक गंभीर फसवणूक नाही तर भारतातील लोकांसाठी एक मोठा घोटाळा आहे.” कॉंग्रेसवर आरोप करीत जेपी नड्डा म्हणाले, “एका कुटुंबाच्या पैशाच्या भूकबळीने देश उद्ध्वस्त झाला. फक्त जर त्यांनी त्यांची शक्ती अधिक सर्जनशील अजेंडासाठी वाहून घेतली असेल तर. कॉंग्रेसच्या राजघराण्यांनी स्वत: च्या फायद्यासाठी अनियंत्रित लूट केली, त्यासाठी त्यांना माफी मागण्याची गरज आहे.”
चीनकडूनही लाच घेतल्याचा आरोप
जेपी नड्डा यांनी राजीव गांधी फाउंडेशनला चीनने पैसे दिल्याचा आरोप केला आहे. हे प्रेम कसं वाढले ते कॉंग्रेसने समजावून सांगावं असं त्यांनी विचारलं होतं. त्यांच्या कार्यकाळात चीनने आमच्या भूमीवर कब्जा केला. या देणगीला सरकारने मान्यता दिली होती की नाही हे कॉंग्रेसने स्पष्ट करावे?
जेपी नड्डा म्हणाले की, राजीव गांधी फाउंडेशनसाठी देणगीदारांची यादी २००५-०६ ची आहे. यात चीनच्या दूतावासाने देणगी दिली, हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. असं का झालं? गरज काय होती? त्यात अनेक उद्योगपती, पीएसयू यांची नावेही आहेत. एवढे पुरेसं नव्हतं का, जे चीन दूतावासातूनही लाच घ्यावी लागली? चीनकडून फाऊंडेशनला ९० लाखांचा निधी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.