Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश विमान प्रवास तिकिटाच्या नियमात बदल, नवे दर काय?

विमान प्रवास तिकिटाच्या नियमात बदल, नवे दर काय?

Subscribe

नवी दिल्ली – विमान भाड्या बाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत ट्विट केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी विमानभाड्या बाबतची मर्यादा रद्द केल्याची घोषणा केली आहे.

येत्या काळात विमान भाड्यात बदल होऊ शकतो. प्रवाशांकडून कोणते भाडे आकारायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आता विमान कंपन्यांना देण्यात आले आहे. केंद्र सरकारने कोरोना सुरू असताना लागू केलेली विमानभाड्या बाबतची मर्यादा रद्द केली आहे. या ‘व्यवस्थे’मुळे विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार होत आहे. मात्र, आता विमान भाड्यात कोणतेही बंधन नाही, असे काहींनी सांगितले. विमान भाड्यातील खालच्या आणि वरच्या मर्यादा काढून टाकण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत विमान कंपन्या प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी ते तिकिटात सवलत देऊ शकतात.

- Advertisement -

ट्विटमध्ये काय?  –

नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एअर टर्बाइन इंधनाची दैनंदिन मागणी आणि किंमतींचे विश्लेषण केल्यानंतर विमान भाड्यांवरील कॅप हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थिरता येण्यास सुरुवात झाली आहे आणि आम्ही त्याबद्दल बोलत आहोत.” नजीकच्या भविष्यात हा प्रदेश देशांतर्गत वाहतुकीत वाढ करण्यास तयार आहे, असा विश्वास आहे.

- Advertisement -

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -