देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना आरोग्य विभागात त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे. सध्या देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या २५४७ वर पोहोचली असून यात २ हजार ३२२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर १६२ जणांना बर करून घरी पाठवण्यात आले आहे. तर आतापर्यंत देशात ६२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने आपत्कालीन निधीनुसार (SDRMF) राज्यांना तब्बल ११ हजार ०९२ कोटींचा निधी मंजूर केला आहे.
कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी दिला निधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यांमध्ये क्वारंटाइन केंद्र स्थापन करण्यासाठी तसेच इतर आवश्यक बाबींसाठी राज्यांना ११ हजार ०९२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. वर्ष २०२०-२१ नुसार स्टेट डिजास्टर रिस्क मॅनेजमेंट फंडनुसार (SDRMF) राज्यांना पहिल्या टप्प्यातील हा निधी मंजूर झाला असून यामुळे राज्यांना कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.
MHA approves release of Rs 11,092 crores under State Disaster Risk Management Fund to all states. This is advance release of Govt of India share of first installment of SDRMF for 2020-21, to augment funds available with state governments: Spokesperson, Ministry of Home Affairs pic.twitter.com/xxAq3Ykeaw
— ANI (@ANI) April 3, 2020
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली
राज्यातील रुग्णांची संख्या ४९० इतकी झाली. मुंबईत ४३ रुग्ण असून यात मुंबई परिसरातील १० रुग्णांचा समावेश आहे. या ४३ नव्या रुग्णांमुळे मुंबईतील आकडा २७८ वर पोहचला आहे. तसेच राज्यात ६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा २९ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये यात वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील प्रत्येकी १ रुग्ण असून, मुंबईतील २ रुग्ण आहेत.