नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच ‘ISRO’ ने केलेल्या अभुतपूर्व अशा कामगिरीमुळे जगभरात भारताची मान उंचावली आहे. इस्रोने चांद्रयान-3 हे यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड केरून मोठा इतिहास रचला आहे. 23 ऑगस्ट 2023 हा दिवसाच्या भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला आहे. काल बुधवारी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या भुपृष्ठावर चांद्रयान-3 यशस्वीरित्या लँड झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार भारत हा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे या मोहीमेत सहभागी असणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे विशेष असे कौतुक करण्यात येत आहे. प्रत्येक भारतीय या मोहीमेनंतर सोशल मीडियावर विविध पोस्ट करत होता. विदेशातील मंत्री, नेते, राष्ट्राध्यक्षांकडून देखील भारताला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पण या सर्वात चर्चा करण्यात येत आहे ती एका ब्रिटिश पत्रकाराची. कारण चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यामुळे या पत्रकाराला मोठी चपराक बसल्याचे बोलले जात आहे. (Chandrayaan-3’s successful landing shuts down ‘that’ British journalist)
हेही वाचा – Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर अभिनेता प्रकाश राज झाले ट्रोल, वाचा…
बीबीसी या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने चांद्रयान-3 अवकाशात झेपावल्यानंतर भारतातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या समस्येवर भाष्य केले होते. भारतात 70 कोटी जनतेला शौचालय नसतानाही तुम्ही चांद्रयान मोहिमेवर पैसे खर्च करत आहात, असा खोचक प्रश्न या पत्रकाराने उपस्थित केला होता. ज्याचे उत्तर देण्यात आले होते. परंतु आता ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्याचे तोंडच बंद झाले आहे.
Listen to what BBC had to say about #Chandrayaan3
– Should India which lacks in Infrastructure and has extreme poverty, Should they be spending this much amount of money on a space program pic.twitter.com/dz28aaaS1T
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) August 23, 2023
महत्त्वाची बाब म्हणजे, ब्रिटिशचे हाय कमिशनर असलेले एलेक्स एलिस यांनीच भारताची चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर हिंदी भाषेत ट्वीट करत भारताला शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामुळे ही एक मोठी चपराक त्या ब्रिटिश पत्रकाराला त्यांच्याच व्यक्तीने लगावल्याचे बोलले जात आहे. “हा केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी अतिशय मोठा क्षण आहे, अभिनंदन” असे एलेक्स एलिस यांच्याकडून ट्वीट करण्यात आले आहे. चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर या ब्रिटिश पत्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A big moment for 🇮🇳 for the 🌎 and also for the 🌝
बधाई हो https://t.co/ysOuw7glPi
— Alex Ellis (@AlexWEllis) August 23, 2023
या पत्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारताचे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला. तसेच, त्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “खरंच?? आमच्या देशात असलेली गरिबी, तुम्ही लादलेल्या अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीचा परिणाम होती. या राजवटीने संपूर्ण उपखंडातील संपत्ती पद्धतशीरपणे लुटली. आमच्याकडून लुटलेली सर्वात मौल्यवान संपत्ती कोहिनूर हिरा नसून आमचा अभिमान आणि आमच्या क्षमतेवर असलेला विश्वास होता.”
Really?? The truth is that, in large part, our poverty was a result of decades of colonial rule which systematically plundered the wealth of an entire subcontinent. Yet the most valuable possession we were robbed of was not the Kohinoor Diamond but our pride & belief in our own… https://t.co/KQP40cklQZ
— anand mahindra (@anandmahindra) August 24, 2023