छत्तीसगड येथील कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर सुरु असलेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून आज सकाळ पासून ही चकमक सुरु होती. परतापूर ठाणे क्षेत्राच्या अंतर्गत महला गावात ही चकमक सुरु आहे. या चकमकीत ११४ वीं बटालियनचे चार जवान शहीद झाले आहेत आणि इतर जवान जखमी झाली आहेत. बीएसएफचे जवान गश्तीवर असताना हा हल्ला झाला आहे. जवान काही अंतरावर असतानाच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. या चकमकीत काही गोळ्या जवांनाना लागल्या. जवांनानी या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले आहे.
#UPDATE : 4 BSF jawans have lost their lives in an encounter with Maoists in Kanker, Chhattisgarh https://t.co/zs8K25iF87
— ANI (@ANI) April 4, 2019