बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपासोबतच्या युतीबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. आम्ही भाजपासोबत हात मिळवणी करण्याऐवजी मरण पत्करू. २०१७ मध्ये आम्ही एनडीएत गेलो ही आमची मोठी चूक होती, असं म्हणत नितीश कुमार यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.
I will rather die than join hands with BJP: Nitish Kumar
— Press Trust of India (@PTI_News) January 30, 2023
जनता दल आणि भाजपाने २०१७ मध्ये युती केली होती. ही युती पुढे टिकली नाही. यापुढे देखील उभय पक्षांमध्ये युती होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचं कुमार यांनी स्पष्ट केलं. दोन पक्षांची युती होती तेव्हा भाजपाला मुस्लीम मतदारांसह जनता दलाचे सर्व समर्थक मतदान करायचे. भाजपाच्या हिंदुत्वाच्या विचारधारेमुळे जे लोक भाजपासोबत नव्हते त्यांची मतं जनता दलामुळे भाजपाला मिळत होती, असं नितीश कुमार म्हणाले.
उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या निराधार आरोपांनंतर २०१७ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत हातमिळवणी करणं ही आमची चूक होती, असंही कुमार म्हणाले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ट्विटरवर ट्रेंड होत आहेत. त्यांच्या ट्रेंडिंगचे कारण म्हणजे त्यांनी आज केलेलं विधान. भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर ते स्पष्ट म्हणाले की, एकवेळ मरण पत्करू, पण भाजपासोबत जाणार नाही. याबाबत ट्विटरवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. याआधीही मुख्यमंत्र्यांनी असे विधान केले होते, त्या दिवसाची आठवण भाजपचे अनेक नेते करत आहेत.
हेही वाचा : गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणाऱ्या अहमद अब्बासीला