घरअर्थजगतचीनची १६०० भारतीय कंपन्यांमध्ये ७,५०० कोटींची गुंतवणूक; केंद्राची माहिती

चीनची १६०० भारतीय कंपन्यांमध्ये ७,५०० कोटींची गुंतवणूक; केंद्राची माहिती

Subscribe

चीनने गेल्या ४ वर्षांत १६०० हून अधिक भारतीय कंपन्यांमध्ये एक अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक केली आहे. सरकारने संसदेत याबाबतची माहिती दिली. राज्यसभेत मंगळवारी एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना भारतातील १६०० हून अधिक कंपन्यांमध्ये एप्रिल २०१६ ते मार्च २०२० दरम्यान चीनने एक अब्ज डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक केल्याची ही माहिती केंद्राने दिली.

भारतीय कंपन्यांमध्ये विशेष करुन स्टार्ट-अप कंपन्यांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सरकारने लेखी उत्तर दिलं आहे. १६०० हून अधिक भारतीय कंपन्यांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चीनने एप्रिल २०१६ पासून मार्च २०२० पर्यंत भारतीय कंपन्यांमध्ये १०२ कोटी अडीच लाख डॉलर्स (१.०२ अब्ज डॉलर्स) म्हणजेच ७५०० कोटींहून अधिकची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक एफडीआयच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्राने दिली आहे.

- Advertisement -

चीनने वाहन उद्योग, पुस्तक छपाई, इलेक्ट्रॉनिक्स, सेवा आणि वीज उपकरणांच्या कंपन्या अशा ४६ क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांना चीनमधून १० कोटी डॉलरहून अधिक निधी एफडीआयच्या माध्यमातून मिळाल्याचं केंद्राने लेखी उत्तरात म्हटलं आहे. चीनने सर्वांत जास्त गुंतवणूक वाहन उद्योगात केली आहे. मागील चार वर्षात चीनने भारतात १७.२ कोटी डॉलरची गुंतवणूक वाहन उद्योगात केली आहे. दरम्यान, चीनकडून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीसंदर्भातील माहिती कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे नसते, असं केंद्रीय राज्य मंत्री अनुराग ठाकुर यांनी सांगितलं.


हेही वाचा – लॉकडाऊन संदर्भातील खोट्या बातम्यांमुळे मजुरांचं स्थलांतर – केंद्र सरकार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -