घरताज्या घडामोडीCongress : काँग्रेसचे आजपासून चिंतन शिबिर, 'या' मुद्यांवर होणार चर्चा

Congress : काँग्रेसचे आजपासून चिंतन शिबिर, ‘या’ मुद्यांवर होणार चर्चा

Subscribe

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या पराभवानंतर काँग्रेसकडून चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे तीन दिवसांचे चिंतन शिबिर आजपासून सुरु झाले असून राजस्थानच्या उदयपूरमध्ये होणार आहे. या शिबिरामध्ये पक्षातील बदल, सत्ताधारी आणि विरोधकांचा सामना करण्यासाठी रणनिती ठरवण्यात येऊ शकते. तसेच आगामी निवडणुकांसाठी तयारी या मुख्य विषयांवर चर्चा होणार आहे. माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी ट्रेनने उदयपूरमध्ये दाखल झाले त्यांच्या स्वागतासाठी मध्यरात्रीपासून कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस चिंतन शिबिराचे आयोजन केलं आहे. या चिंतन शिबिरामध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या अनेक बड्या चेहऱ्यांनी भाजप आणि इतर राजकीय पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठं नुकसान झालं आहे. तसेच निवडणुकांमधील काँग्रेसचं अपयश पाहता हे शिबिर नवी दिशा ठरवण्यासाठी महत्त्वाचे आहे. यावेळी काँग्रेसमध्ये एक परिवार एक तिकीट या विचारावर चर्चा होऊ शकते. सोनिया गांधी यांनी या चिंतन शिबिरासाठी जय्यत तयारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

राहुल गांधी ट्रेनने उदयपूरमध्ये दाखल

काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी ट्रेन प्रवास करत उदयपूरमध्ये चिंतन शिबिराला हजेरी लावली आहे. गुरुवारी रात्री ८ वाजता त्यांनी रोहिल्ला रेल्वे स्टेशन गाठले होते. त्यांच्यासोबत ७४ नेतेसुद्धा उपस्थित होते. राहुल गांधी यांच्यासाठी २ डब्ब्यांची व्यवस्था करण्यात आली होती. ७४४ किलोमीटरचा प्रवास करताना राहुल गांधी यांनी कुलींसोबत चर्चा केली. शुक्रवारी पहाटे उदयपूरच्या सिटी रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त केला होता.

- Advertisement -

या प्रमुख मुद्द्यांवर होणार चर्चा

काँग्रेसच्या चिंतन शिबिराला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. या चिंतन शिबिरामध्ये मोठे नेते उपस्थित राहणार आहे. तसेच देशातील काँग्रेसचे नेते येणार आहे. इतर समित्या सार्वजनिक क्षेत्रातील गूंतवणूक, वाढती महागाई, अल्पसंख्याकांच्या समस्या आणि महिलांच्या समस्यांवर चर्चा करतील. तर नवीन शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी यावर युवक चर्चा करणार आहेत. एमएसपी कायदेशीर करणे, कर्जमाफी आणि गव्हाची किंमत या मुद्द्यावर कृषी समिती चर्चा करणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील सुधारणांवर संघटना समितीकडून चर्चा केली जाईल. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक कुटुंब एक तिकीट धोरणही चर्चेच्या अजेंड्यावर आहे. काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिरात जातीय ध्रुवीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आगामी निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करण्यावर चर्चा होणार आहे.


हेही वाचा : Raipur Helicopter Crash : रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा अपघात, दोन वैमानिकांचा मृत्यू

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -