घरताज्या घडामोडीमोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात काँग्रेसला अपयश; पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा

मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात काँग्रेसला अपयश; पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा

Subscribe

मुद्देसूदपणे आणि आक्रमकपणे मोदी सरकारचं आर्थिक अपयश देशाला दाखवता आलं असतं. मात्र हे करण्यात आम्ही कमी पडलो, असा खुलासा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक चुका झाल्या आहेत. मात्र, मोदी सरकारच्या आर्थिक चुका दाखवण्यात काँग्रेसला अपयश आल्याचा मोठा खुलासा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी यासारख्या विविध आर्थिक बाबींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. मात्र मोदी सरकारचं हे अपयश लोकांसमोर आणण्यात तसंच त्यांच्या विरोधात जनमत तयार करण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला, अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

नोटाबंदी असो की जीएसटीची अंमलबजावणी, हे निर्णय घेताना कोणाशीही सल्लामसलत न करता पंतप्रधान मोदी यांनी मनमानीपणे निर्णय घेतले. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारला अर्थव्यवस्था नीट हाताळता आलेली नाही. मात्र या सरकारचं हे अपयश देशातील जनेतला दाखवून देण्यात आम्ही कमी पडलो. मात्र, सुदैवाने अद्याप संसदेतील भाषणांवर आणि ते लोकांपर्यंत जाण्याच्या व्यवस्थेवर बंदी नाही. संसदेत आमची संख्या कमी आहे. मात्र, असं असलं तरी मुद्देसूदपणे आणि आक्रमकपणे मोदी सरकारचं आर्थिक अपयश देशाला दाखवता आलं असतं. मुख्य म्हणजे हिंदीमधून मुद्देसूद प्रभावी भाषणं करून मोदी सरकारचं आर्थिक अपयश देशातील लोकांपर्यंत पोहोचवता आलं असतं. पण त्यात काँग्रेस कमी पडली. दरम्यान, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम नियमितपणे मोदी सरकारच्या एकंदरीत चुकीच्या कारभारावर वृत्तपत्रांमधील लेखांमधून मुद्देसूद मांडणी करत त्यावर टीका करतात. देशातील लोकांना या सरकारचे दोष दाखवतात. तथापि, संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी स्थानिक भाषेतून मोदी सरकारचं आर्थिक अपयश दाखवून देण्याची गरज आहे. त्यातही आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून कमी पडत आहोत, अशी कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. याशिवाय, त्यांना काँग्रेसच्या पुनरुज्जीवनावरही भाष्य केलं.

- Advertisement -

हेही वाचा – लॉकडाऊन लांबल्यास जनक्षोभाचा धोका; सुशीलकुमार शिंदेंना वाटतेय भीती


पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेसचं पुनरुज्जीवन करण्यासाठी पक्ष विचार करत आहे. नव्या दमाचे तरुण पक्षात येण्याची गरज आहे. काँग्रेसला सत्तेची सवय आहे. यामुळेच आम्ही राज्यात गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्ष म्हणून आक्रमकपणे काम करू शकलेलो नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -