घरदेश-विदेश...जनतेच्या प्रश्नावर उत्तर द्यावे लागेल, राहुल गांधींची मोदींवर टीका

…जनतेच्या प्रश्नावर उत्तर द्यावे लागेल, राहुल गांधींची मोदींवर टीका

Subscribe

बुधवारी काँग्रेसच्या निदर्शनांचा संदर्भ देत लोकांनी कितीही काळी जादू केली तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर कधीही निर्माण होणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. यानंतर राहुल गांधींनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून पंतप्रधान मोदींना उत्तर दिले आहे.

ट्विटमध्ये काय? –

- Advertisement -

या ट्विटमध्ये पंतप्रधानांना महागाई दिसत नाही का? बेरोजगारी दिसत नाही का? तुमचे काळे कारनामे लपवण्यासाठी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा मोडून काढणे आणि ‘काळी जादू’ सारखे अंधश्रद्धेचे काम करून देश भरकटणे बंद करा, पंतप्रधानजी. जनतेच्या प्रश्नांवर उत्तरे द्यावी लागतील, असे ट्विट त्यांनी केले आहे.

- Advertisement -

यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणातील गरिबांना मोफत रेशन देण्यापूर्वी 20 रुपयांना तिरंगा विकत घेण्यास भाग पाडल्याच्या घटनेचा निषेध केला होता. या संपूर्ण घटनेबाबत त्यांनी फेसबुक पोस्टही लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, तिरंगा हा आमचा अभिमान आहे, तो प्रत्येकाच्या हृदयात आहे. राष्ट्रवाद कधीच विकता येत नाही, रेशन देण्याऐवजी तिरंग्याच्या नावावर गरिबांकडून 20 रुपये उकळले जात आहेत ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तिरंग्यासोबतच भाजप सरकार आपल्या देशातील गरिबांच्या स्वाभिमानावरही आघात करत आहे.

 

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -