गायक केके याचं पार्थिव मुंबईत दाखल; उद्या वर्सोवातील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
सौरभ गांगुलीचा बीसीसीआय पदाचा राजीनामा
आपलं भविष्य घडविण्यात एसटीचा हक्क आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एसटीच्या काळात त्यांनी पराक्रम केले आहेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
गाव तिथं एसटी आहे शहरात सुद्धा एसटी आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आता आयपीएल संपली, तिथं अनेकांनी कशी मदत केली हे आपण पाहिलं – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज मी एसटीमुळे आहे, असं सांगणारी अनेकजण आहेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एसटी चालू कशाला करायची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना काळात एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बहादूरीचं काम केलं – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सर्व काही करता येतं, पण पैशाचं काय करता येत नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जे सगळं शक्य आहे, ते आम्ही केलं आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आपण या राज्याचं वैभव आहात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पु.ल. देशपांडेची कथा वाचायला हवी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एसटी ही आपली सगळ्यांची आहे. आपलं हे महाराष्ट्राचं कुटुंब आहे. – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भगवा आणि निळा एकत्र आल्याने महाराष्ट्राची ताकद वाढेल – संजय राऊत
पुणे महापालिकेवर भगवा फडकावणार – संजय राऊत
प्रत्येकाचा आदर्श काम आहे चुकीचं काही दाखवू नका पवार साहेबांचा पुर्ण मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे – संजय राऊत
महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे – संजय राऊत
हनुमान चाळीसा आम्हाला सुध्दा येत फक्त राजकारण आम्ही करत नाही – संजय राऊत
आम्ही केलेली काम भोंग्यावरून सांगू – संजय राऊत
कोविडच्या काळात शिवसेनेने उत्तम काम केलं लोकांना आमचा आधार राहावा म्हणून आम्ही काम करतो – संजय राऊत
रयतेचं राज्य उभं केलं या राज्याचं नेतृत्व शिवसेना करते तिकीट नको पण जबाबदारी द्या – संजय राऊत
आम्ही रस्ते, बेरोजगारी यावर काम करतोय हे शिवसैनिक करतो – संजय राऊत
आम्ही भोंगे लावू आणि महापालिकेत काय काम केलन ते सांगू – संजय राऊत
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात कोल्हापुरात ‘टाहो मोर्चा’
ज्यांना मदत मिळाली नाही त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा – चंद्रकांत पाटील
पूराच्या पाण्याचं नियोजन नाही – चंद्रकांत पाटील
पूरस्थिती निर्माण झाली तर काय कराचं – चंद्रकांत पाटील
त्यामुळे आम्ही आज मोर्चा काढणार आहोत – चंद्रकांत पाटील
काय झाल्यास आम्ही काय करणार आहोत – चंद्रकांत पाटील
चौदा हजार कोटीचा परतावा मिळाला आहे – चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाई बसमध्ये दाखल
शिवास बसचा आज लोकार्पण सोहळा
केंद्र सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्या प्रीमियममध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
भविष्यात या योजना आधिक सशक्त करण्यासाठी तसेच त्या चालू ठेवण्यासाठी प्रीमियम वाढवने गरजेचे असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.
पूर्वी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी वार्षीक हप्ता 330 रुपये होता.
आता आजपासून त्यामध्ये वाढ करण्यात आली असून या योजनेसाठी 436 रुपये द्यावे लागणार आहेत.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.
पूर्वी या विमा योजनेचा वार्षीक हप्ता हा 12 रुपये एवढा होता.
आता त्यामध्ये वाढ करून तो 20 रुपये करण्यात आला आहे.
नवी प्रीमियम वाढ आजपासून लागू करण्यात आली आहे.
जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल आणि तुम्ही बँकेकडून होम लोन घेतले असेल तर आजपासून तुमच्या इएमआयमध्ये वाढ होणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून होम लोनसाठी एक्सटर्नल बेंचमार्क लॅडिंग रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे.
EBLR 40 बेसिस पॉइंटने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आजापासून होम लोन महाग होणार आहे.
अॅक्सिस बँकेकडून सॅलरी आणि सेव्हिंग खात्यावर आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खात्यातील मिनिमम शिल्लक रकमेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
पूर्वी ही 15 हजार असलेली रक्कम आता 25 हजार रुपये करण्यात आली आहे.
आजपासून थर्ड पार्टी वाहन विम्यात देखील वाढ करण्यात आली आहे.
याचा मोठा फटका हा वाहनधारकांना बसू शकतो.
आज एक जून आहे, महिन्याचा पहिला दिवस असल्याने ज्येट फ्यूल आणि एलपीजी गॅसच्या किमतींमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे.