देशभरात गेल्या २४ तासंमध्ये २२९३ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्रशासन आणि विविध राज्यांच्या प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.
2293 new cases, 71 deaths in the last 24 hours; this is the highest number of cases reported in one day: Ministry of Health and Family Welfare https://t.co/kd8KWQJgY2
— ANI (@ANI) May 2, 2020
मध्य प्रदेशातील इंदूर येथील पोलिसांनी काँक्रिट मिक्सरमधून लपून प्रवास करणाऱ्या १८ लोकांना पकडले. डीएसपी उमाकांत चौधरी म्हणाले की, सर्व जण महाराष्ट्रातून लखनऊला जात होते. आता ट्रक पोलिस ठाण्यात पाठविण्यात आला आहे आणि एफआयआर दाखल केले आहे.
#WATCH 18 people found travelling in the mixer tank of a concrete mixer truck by police in Indore, Madhya Pradesh. DSP Umakant Chaudhary says, "They were travelling from Maharashtra to Lucknow. The truck has been sent to a police station & an FIR has been registered". pic.twitter.com/SfsvS0EOCW
— ANI (@ANI) May 2, 2020
लॉकडाऊच्या काळात नाशिक शहर आणि जिल्ह्यातील शेल्टर होममध्ये असलेल्या उत्तरप्रदेशातील कामगार तसेंच नागरिकांना आज श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून लखनऊ येथे पाठविण्यात आले. या ट्रेन मधील नागरिकांशी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी संवाद साधला तसेच ट्रेनला हिरवा झेंडा दाखवत रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
गेल्या २४ तासांच देशात कोरोनाग्रस्त ७१ रुग्णांचे बळी गेले आहेत. तसंच २ हजार २९३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील मृतांचा आकडा १ हजार २१८वर पोहोचला असून एकूण रुग्णांचा आकडा ३७ हजार ३३६ झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
2293 new cases, 71 deaths in the last 24 hours; this is the highest number of cases reported in one day: Ministry of Health and Family Welfare https://t.co/kd8KWQJgY2
— ANI (@ANI) May 2, 2020
राज्यात कोरोनाचा विषाणूचा फैलाव वाढत आहे. दरम्यान पुण्यात ६८ वर्षीय कोरोनबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १०० वर पोहोचला आहे. पुण्यातील आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू मुंबईत झाला आहे.
A 68-year-old patient who had tested positive for COVID19 passes away in Pune. The cause of death is acute respiratory failure due to ARDS with Myocarditis with COVID19 infection. Total death toll in Pune district is now 100: Pune Health officials, Maharashtra
— ANI (@ANI) May 2, 2020
जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ३४ लाखांहून अधिक झाला आहे. सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेत कोरोनाचे ११ लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. जॉन्स हॉपकिंग विद्यापिठाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत अमेरिकेत १ हजार ८८३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील मृतांचा आकडा ६५ हजारपार गेला आहे.
#COVID19 deaths in the United States of America (USA) climbed by 1,883 in the past 24 hours, as per Johns Hopkins University tally: AFP news agency
— ANI (@ANI) May 2, 2020
देशातील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आता देशात ४ मे पासून १७ मेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात गृह मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. लॉकडाऊनदरम्यान ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही सूट देण्यात आल्या आहेत.
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये मिळणार ही सूट
देशात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आलेय. ग्रीन झोनमध्ये आर्थिक घडामोडींना सूट देण्यात आलीय. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, ग्रीन झोनमध्ये ३०७ जिल्ह्यांत बस सेवा सुरू केली जाऊ शकेल. परंतु, बसची क्षमता ५० टक्क्यांहून अधिक राहणार नाही. त्यामुळे ५० आसनी बसमध्ये केवळ २५ प्रवासीच प्रवास करू शकतील. त्याच पद्धतीने डेपोमध्येही ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत. या जिल्ह्यांत न्हावी, सलून यांसहीत अन्य महत्त्वाच्या सेवा आणि वस्तू पुरवणार्या संस्थांनाही ४ मेपासून सूट मिळू शकेल. सिनेमा हॉल, मॉल, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इत्यादी बंद राहतील.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल १००८ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार ५०६वर पोहचला आहे. म्हणून संचारबंदी उठवल्यास कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमानात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शुक्रवारी मुंबईमध्ये २६ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ४८५वर पोहचला आहे.