घरCORONA UPDATECoronavirus:...म्हणून भारतात करोनाने मृत्यू कमी होतील

Coronavirus:…म्हणून भारतात करोनाने मृत्यू कमी होतील

Subscribe

आयसीएमआरचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स इम्युनोलॉजीचे माजी डीन डॉ. नरिंदर मेहरा म्हणाले की सामान्यत: कोणत्याही विषाणूच्या संसर्गा नंतर लिम्फोसाइटची संख्या वाढते परंतु कोविड -१९ च्या हल्ल्यात शरीरातील लिम्फोसाइटची संख्या कमी होते.

जगभर करोनाने पाय पसरल्यानंतर भारतात देखील त्याने शिरकाव केला आहे. देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडऊन घोषित करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच नागरिकांना बाहेर येण्यास मुभा देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत करोनाचे ६६५ रुग्ण आढळले होते. त्यापैकी ४३ जण बरे झाले आहेत. तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, डॉ. नरिंदर मेहरा यांनी दावा केला आहे की, इतर देशांप्रमाणे भारतात मृत्यूची संख्या वाढणार नाही. यासाठी कारणही त्यांनी सांगितले आहे.

डॉ. नरिंदर मेहरा यांनी दावा केला आहे की, इतर देशांप्रमाणे भारतात मृत्यूची संख्या वाढणार नाही. कारण भारतीय लोकांची प्रतिकारशक्ती बरीच चांगली आहे. आयसीएमआर ( इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एम्स इम्यूनोलॉजी (रोगप्रतिकारशास्त्र)चे माजी प्रमुख डॉ. नरिंदर मेहरा म्हणाले की कोणत्याही विषाणूच्या संसर्गानंतर लिम्फोसाइटची संख्या सामान्यत: वाढते परंतु कोविड -१९ च्या हल्ल्यात शरीरातील लिम्फोसाइटची संख्या कमी होते आणि नंतर व्यक्तीचा मृत्यू होतो. लिम्फोसाइट्स पांढऱ्या रक्त पेशी आहेत जे शरीराच्या संरक्षक पेशींच्या मुख्य प्रकारांपैकी एक आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: इटलीत करोनाचं थैमान; दिवसरात्र येतोय केवळ अँबुलन्सचा आवाज

नरिंदर मेहरा म्हणाले की, रोग प्रतिकारशक्तीमध्ये भारत अव्वल आहे. एम्सच्या अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, भारतातील विविधतेमुळे युरोपीय देशांपेक्षा रोगप्रतिकारक प्रतिकृती जीन्स अर्थात रोग प्रतिकारशक्तीचे मार्गदर्शन करणारी जीन्स अधिक मजबूत आहेत. त्यांनी सांगितले की देशात करोनाने कमी मृत्यू होण्याची तीन कारणे आहेत. शारीरिक अंतर, रोगप्रतिकार प्रणाली आणि पर्यावरण. हळद, आले आणि मसालेदार अन्नही आपली प्रतिकारशक्ती वाढवते. त्याच वेळी, डॉ नरिंदर मेहरा म्हणतात की ते आता फ्रान्स, अमेरिका, हंगेरियन देशातील कोरोनाचा नमुना घेऊन आंतरराष्ट्रीय अभ्यास करण्याचा विचार करू लागले आहेत.


हेही वाचा – Coronavirus: लॉकडऊनने करोनाला रोखता येणार नाही…!

इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूचे प्रमाण वाढणार नाही, असा दावा डॉ. नरिंदर मेहरा यांनी केला आहे. याचे कारण व्यापक प्रतिकारशक्ती आहे. ते म्हणाले की, इटली, स्पेन, अमेरिका यासारख्या भारतात मृत्यूचे प्रमाण वाढणार नाही. इटली आणि स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -