दिल्लीमधील प्रदूषणामध्ये (Delhi Pollution) वाढत आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून दिल्लीला ओळखले जाते. दिल्लीतील वाढत्या प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजना केल्या.
दिल्ली आणि एनसीआरमधील (Delhi-NCR) वाढत्या प्रदूषणामुळे सरकारने दिवाळीमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. फटाक्यांवर बंदी असताना देखिल मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले. दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणामुळे सुप्रीम कोर्टाने दिवाळीत फटाके फोडण्यावर पूर्णपणे बंदी घतली. एखाद्या व्यक्तीने फटाके फोडल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तरी देखिल दिल्लीकरांकडून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले गेले.
दिल्लीतील प्रदूषण मध्ये दिवाळीच्या आधीच प्रचंढ वाढ झाली होती. दिल्ली आणि एनसीआरमधील प्रदूषणामुळे सुप्रीम कोर्टने फटाक्यांवर बंदी घातली होती, त्यानंतरही देखील अनेक भागात फटाके फोडून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले. १२ नोव्हेंबर ला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून अनेक भागात मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सूरू झाली. मध्यरात्रीपर्यंत फटाके फोडण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली.
फटाक्यांमुळे दिल्लीतील प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील हवेची पातळी घसरली होती, मात्र फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता आणखी घसरली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, सोमवारी सकाळी दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI-Air Quality Index) 296 होता, ही आकडेवारी सामान्यपेक्षा सहापट जास्त आहे. CPCB – PM 2.5 नुसार, लोनी गाझियाबादमध्ये सकाळी 6 वाजता AQI (Air Quality Index) 414 होता, तर नोएडा सेक्टर 62 मध्ये AQI 488, पंजाबी बाग – 500 आणि रोहिणीमध्ये AQI 456 होता.