देशाची राजधानी दिल्लीमधील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. शनिवार सलग तिसऱ्या दिवशी दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता खराब खालावली आहे. हवेतील प्रदुषणामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यानुसार, वाढत्या धुक्यांमुळे दृश्यमानता कमी होत आहे. तसेच, हवेतील पीएम 2.5 पातळी वाढल्यामुळे नागरिकांना डोळ्यात जळजळ, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यात अडचण यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (delhi ncr air pollution aqi level in severe condition pollution)
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या SAFAR या अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनुसार, दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेतील PM2.5 प्रदूषणापैकी 30 टक्के प्रदूषण हे भुसभुशीतपणामुळे होते. दिल्ली सरकारने एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने (CAQM) शिफारस केलेले प्रदूषण-विरोधी निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार राज्यामध्ये BS VI नसलेल्या डिझेलवर चालणाऱ्या हलक्या मोटार वाहनांवर बंदी समाविष्ट आहे. शिवाय, अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ट्रकशिवाय कोणत्याही डिझेल ट्रकला दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही.
विशेष म्हणजे या निर्बंधांचे उल्लंघन केल्यास 20,000 रुपये दंड आकारला जाईल. दिल्ली आणि नोएडामध्ये प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रात दिवाळीदरम्यान फटाक्यांच्या धुरामुळे आणि हवेत तरंगणाऱ्या विषारी सूक्ष्म कणांमुळे हवेची गुणवत्ता खालावली होती. अतिसूक्ष्म धूलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर) हवेतील प्रमाण वाढल्याने मुंबईतील हवेचा दर्जा हा आरोग्यास हानीकारक झाला होता.
हेही वाचा – गुजरातचा ‘पोपट’ जगवण्यासाठी भारतीय जनता पक्ष शिकस्त करतेय; ‘सामना’तून भाजपावर निशाणा