घरदेश-विदेशपुलवामा शहिदांच्या पत्नींची निदर्शने, राजस्थानमध्ये भाजपच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज

पुलवामा शहिदांच्या पत्नींची निदर्शने, राजस्थानमध्ये भाजपच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज

Subscribe

नवी दिल्ली : वीर महिलांच्या बाबतीत गेल्या काही दिवसांपासून राजस्थान सरकार आणि भाजपमधील संघर्ष वाढत चालला आहे. अशोक गेहलोत सरकारच्या विरोधात १० दिवस निदर्शने करणाऱ्या तीन शहीदांच्या वीर महिलांना जयपूर पोलिसांनी काल, शुक्रवारी पहाटे ३ वाजता धरणा स्थळावरून हटवले आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजप खासदार किरोरी लाल मीणा यांना ताब्यात घेण्यात आले. या अटकेविरोधात भाजप कार्यकर्तांनी आज तीव्र निषेध केला आहे. अशोक गेहलोत यांच्या घराकडे आज मोर्चा काढताना भाजप कार्यकर्ते हिंसक झाल्याचे दिसून आहे. आंदोलकांनी दगडफेक करत पोलिसांचे बॅरिकेड्स तोडले. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सध्या पोलीस आणि आंदोलक दोघेही आमनेसामने आहेत.

वीर महिलांचा अपमान
जयपूरचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या घराबाहेर निदर्शने करत असताना, पोलिसांनी 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या तीन जवानांच्या वीर महिलांना धरणा स्थळावरून हटवले आणि त्यांना पायलट यांच्या घराजवळील रुग्णालयात दाखल केले होते. या कारवाईविरोधात भाजपने राज्य सरकारवर टीका करताना “वीर महिलांचा अपमान” म्हटले आहे आणि कुटुंबांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

सचिन पायलट यांची महिलांप्रती संवेदनशीलता
पोलिसांच्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सचिन पायलट यांनी टोंक येथे पत्रकारांना सांगितले की, वीर महिलांचे प्रश्न संवेदनशीलतेने ऐकले पाहिजेत. तसेच “रस्ते बांधणे, घरे बांधणे, पुतळे बसवणे यासारख्या मागण्या आपण पूर्ण करू शकतो, यावर आजही माझा विश्वास आहे. मात्र वीर शहिदांच्या वीर महिलांच्या मागण्या ऐकायला आपण तयार नाही, असा संदेश जाऊ नये, असेही पायलय म्हणाले. ही दुसरी बाब आहे की, त्यांचे मुद्दे आपल्याला मान्य असो वा नसो, पण त्यांच्या मागण्या ऐकताना आपण आपला अहंकार बाजूला ठेवला पाहिजे.ॉ

वीर महिलांना राजकीय फायद्यासाठी वापरल्याचा मीनावर आरोप
28 फेब्रुवारीपासून वीर महीला त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या मुलांना अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळावी यासाठी नियमात बदल करण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या इतर मागण्यांमध्ये गावात रस्ते बांधणे आणि हुतात्म्यांचे पुतळे बसवणे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी किरोरी लाल मीना यांच्यावर राजकीय फायद्यासाठी वीर महिलांना वापरल्याचा आरोप केला आहे, तर मीना यांनी पोलिसांवर “त्यांना मारण्याचा प्रयत्न” केल्याचा आरोप केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -