घरदेश-विदेशफडणवीसांच्या शपथविधीतील काँग्रेसने शोधली चूक; आणि राज्यपालांना कॉंग्रेसने घेरले

फडणवीसांच्या शपथविधीतील काँग्रेसने शोधली चूक; आणि राज्यपालांना कॉंग्रेसने घेरले

Subscribe

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीवरुन राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर कॉंग्रेसकडून टीका करण्यात आली आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी सकाळीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. त्यांच्या शपथविधीवरुन राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर कॉंग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. या शपथविधीनंतर काँग्रेसने राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांना काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीपसिंह सूरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन, काही प्रश्न विचारत उत्तरं मागितली आहेत. शिवाय काँग्रेसने राज्यपालांवर एकप्रकारे पक्षपातीपणाचा आरोप देखील केला आहे.

रणदीपसिंह सूरजेवाला यांनी राज्यात शनिवारी घडलेल्या सर्व घटनाक्रमाची माहिती मागितली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची रात्रीत बैठक कशी आणि कधी झाली इथपासून ते राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय किती वाजता घेतला?, असे प्रश्न उपस्थित करत, सूरजेवाला यांनी भाजपवर तोफ डागली.

- Advertisement -

रणदीप सूरजेवाला यांनी विचारलेले प्रश्न

मोदी-अमित शाहजी भाजपने सरकार बनवण्याचा दावा कधी केला?
भाजप-राष्ट्रवादीच्या किती आमदारांचं सह्यांचं पत्र मिळालं?
राज्यपालांनी सर्व आमदारांच्या सह्यांची पडताळणी एका तासात कसं केलं?
राज्यपालांनी केंद्र सरकारला राष्ट्रपती राजवट हटवण्याची शिफारस किती वाजता केली?
केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल रात्री किती वाजता झाली? त्यामध्ये कोण कोण मंत्री होते? केंद्राने किती वाजता राष्ट्रपतींना राजवट हटवण्याची शिफारस केली?
केंद्राची शिफारस राष्ट्रपतींना किती वाजता पाठवण्यात आली?
राष्ट्रपतींनी केंद्राची शिफारस किती वाजता स्वीकारली?
राज्यपालांनी कोणत्या पत्राद्वारे फडणवीस आणि अजित पवारांना शपथविधीसाठी निमंत्रण दिलं?
शपथ किती वाजता झाली? प्रायव्हेट न्यूज एजन्सी सोडून ना सरकारी डीडी वृत्तवाहिनी किंवा कोणत्याच मीडियाला का माहिती दिली नाही?
मुख्य न्यायाधीशांना शपथविधीला का बोलावलं नाही?
राज्यपालांनी आतापर्यंत का सांगितलं नाही की बहुमत कधी सिद्ध करायचं आहे?


हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ४ वर्षांपूर्वीचे ट्विट व्हायरल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -