जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या फैलाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी उघडकीस येत आहे. कोणी यादरम्यान प्रेयसीला भेटायला जात आहे तर कोणाचे लग्न तुटत आहे. अशीच एक घटना बिहारच्या दुल्हनीबाजार येथे घटली आहे.
बायको काही कारणास्तव माहेरी गेली होती. मात्र त्याच दरम्यान लॉकडाऊन जारी झाल्याने ती माहेरीच अडकली. मग नवऱ्याने तिला सतत सासरी बोलावले. पण प्रवास करणाऱ्यावर बंदी घातल्यामुळे तिला सासरी येणे शक्य झालं नाही. त्यामुळे नवऱ्याला राग आला आणि त्याने प्रेयसीशी दुसर लग्न केलं. मग याबाबत बायकोला माहिती मिळाल्यावर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
धीरजकुमार असं याचं नाव असून त्याचं काही वर्षापूर्वीचं लग्न झालं होत. काही कारणास्तव याची बायको गेल्या महिन्यात माहेरी गेली होती. याचवेळी लॉकडाऊन जारी झाला आणि ती पुन्हा सासरी येऊ शकली नाही. धीरजने तिला अनेक वेळा घरी येण्यासाठी फोन केल्या. मात्र तिने लॉकडाऊन संपेपर्यंत येऊ शकत नाही असं उत्तर त्याला दिलं. त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने शेजारी गावातील आपल्या प्रेयसीशी सोबत लग्न केलं.
यानंतर धीरजच्या बायकोला याबाबत कळल्यानंतर तिने नवरा आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी धीरजविरोधात हुंडाबळी, बायकोचा छळ, फसवणूक आणि बायकोला काही माहिती न देता दुसर लग्न केल्याचा गुन्हा दाखल केला. धीरजची चौकशी करून त्याला तुरुंगात ठेवण्यात आले. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा – रिलायन्स आणि फेसबुक आणणार Super App, जाणून घ्या खासियत