घरताज्या घडामोडीजाहिराती थांबवून १२५० करोड वाचवा; सोनिया गांधींनी सरकारला दिल्या पाच सूचना

जाहिराती थांबवून १२५० करोड वाचवा; सोनिया गांधींनी सरकारला दिल्या पाच सूचना

Subscribe

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी काही सूचना दिल्या आहेत.

भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार कित्येक कठोर निर्णय घेत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांशी फोनवर चर्चा केली आणि कोरोनाशी सामोरे जाण्यासाठी सूचना मागितल्या. आता कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. त्यांनी तातडीने याची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे सोनिया गांधींनी समर्थन केलं. याशिवाय पंतप्रधानांसमोर सूचनादेखील ठेवल्या आहेत. त्या खालीलप्रमाणेः

१. सरकारने टेलीव्हिजन, प्रिंट आणि ऑनलाईन माध्यमांना दिलेल्या सर्व जाहिराती थांबवल्या पाहिजेत. ते दोन वर्षे बंद केले पाहिजेत, जेणेकरून वर्षाकाठी १२५० करोड रुपयांची बचत होईल. ती बचत कोरोनाशी लढण्यासाठी वापरली जावी.

- Advertisement -

२. संसदेची नवी इमारत बांधण्यासाठी सरकारने दिलेले २० हजार करोड रुपये रद्द करावेत. माझा असा विश्वास आहे की सध्याच्या संसदेच्या इमारतीतून काम केले जाऊ शकते. या रकमेतून रुग्णालय, पीपीई अशा सुविधांची व्यवस्था केली जाऊ शकते.

३. खासदारांचे निवृत्तीवेतन, वेतनात ३० टक्के कपात केली गेली. ती मजूर, शेतकरी आणि लहान व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून वापरता येऊ शकते.

- Advertisement -

४. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्यमंत्री यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांचा परदेशी दौरा थांबवला पाहिजे. हे पैसे कोरोनाविरूद्धच्या लढ्यात वापरता येतील. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी थांबवून ३९३ कोटी वाचू शकतात असं पत्रात लिहिलं आहे.

५. पीएम केअर्समध्ये मदतीच्या स्वरूपात जी काही रक्कम आली आहे ती पंतप्रधान मदत निधीमध्ये हस्तांतरित केली जावी. यामुळे पारदर्शकता येईल. पंतप्रधान मदत निधीमध्ये ३८०० कोटींची रक्कम आहे. दोन्ही निधींची रक्कम एकत्र वापरली जाऊ शकते.

महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारने सोमवारी मंत्रिमंडळात राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यासह सर्व खासदारांच्या पगारामध्ये किंवा निवृत्तीवेतनात ३० टक्के कपात करण्याची घोषणा केली. ही रक्कम कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धामध्ये वापरली जाईल. त्याशिवाय एमपीएलएडीची रक्कम देखील यात वापरली जाईल. ज्यास अनेक राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला होता.


हेही वाचा – Coronavirus: कोरोनाचा कहर; जगात मृतांचा आकडा ७४ हजार पार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -