घरक्राइममणिपूर हिंसाचारानंतर कलम १४४ लागू तर, इंटरनेट सेवा बंद; पोलीस बंदोबस्त तैनात

मणिपूर हिंसाचारानंतर कलम १४४ लागू तर, इंटरनेट सेवा बंद; पोलीस बंदोबस्त तैनात

Subscribe

मुंबई | मणिपूरच्या (Manipur) चुराचांदापूरमध्ये हिंसाचारच्यी घटना घडली आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह (Chief Minister N Biren Singh) यांचा चुराचांदपूरात न्यू लामका भागात जिम आणि क्रीडा सुविधा केंद्राचे उद्घाटन होणार होते. त्या कार्यक्रमापूर्वी चुराचांदापूरमध्ये काही आंदोलकांनी खुर्चा तोडून स्टेज जाळल्याची घटना घडली आहे. या हिंसाचाराचे नेतृत्व मणिपूरचे स्थानिक आदिवासी नेते करत आहेत. मणिपूर सरकारच्या निर्णयाचा भाजप नेतृत्वाखाली हा गट निषेध करत आहे.

मणिपूर सरकारने आदिवासींसाठी राखीव व संरक्षित वनक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात येणार आहेत. मणिपूर सरकारच्या या आदेशानंतर चर्च पाडत असल्याचा आरोप आदिवासी मंच करत आहेत. या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्च केला होता. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चुराचांदपूर जिल्ह्यात पोलिसांनी कलम १४४ लागू केले असून येथील इंटरनेट सेवा बंद केली आहे. या हिंसाचारानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. आदिवासी नेत्यांनी आज सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळीत चुराचांदपूर बंदची हाक दिली आहे.

- Advertisement -

चुराचंदपूर जिल्ह्यातील शांतता भंग होण्याची भीती आणि मालमत्तेला धोका लक्षात मोठ्या मेळाव्यावर पोलिसांनी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या हिंसाचारामुळे मुख्यमंत्र्यांचा आज होणार कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती चुराचंदपूर जिल्ह्याचे एडीएम एस थियेनलटजॉ गंगटे यांनी दिली दिली आहे.

सरकारने तीन चर्च पाडले

- Advertisement -

मणिपूर सरकारने ११ एप्रिल रोजी बेकायदा बांधकामाच्या आरोपावरून इन्फाळ पूर्वेतील तीन चर्च पाडले होते. यामध्ये इव्हॅजेलिकल बॅप्टिस्ट कन्व्हेन्शन चर्च, इव्हँजेलिकल लुथेरन चर्च आणि कॅथोलिक होली स्पिरिट चर्च यांचा समावेश होता. सरकारच्या आदेशाविरोधात मणिपूर उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने राज्य सरकारच्या आदेशला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -