घरदेश-विदेशसंसाराला कंटाळून त्याने केली आत्महत्या; सात बायकांनी केला पत्नी असल्याचा दावा

संसाराला कंटाळून त्याने केली आत्महत्या; सात बायकांनी केला पत्नी असल्याचा दावा

Subscribe

हरिद्वार पोलीस सध्या धर्मसंकटात सापडले आहेत. एका व्यक्तीने संसाराला कंटाळून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह आपल्याला मिळवा, कारण आपणच त्याची पत्नी आहोत, असा दावा चक्क पाच बायकांनी केला आहे. त्यामुळे तो मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा हे पोलिसांना कळेनासे झाले आहे. विशेष म्हणजे त्या प्रत्येकजणींनी आपल्या नवर्‍याचे अन्य कोणा स्त्रीसोबत लग्न झाले होते, हे माहित नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस ठाण्यातील भांडणे, नाटक यांचा उत आला.अखेर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार केल्यानंतर अजून दोन बायका पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनीही तो आपला पती असून त्याचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी आता हे प्रकरण मिटवण्यापूर्वी अजून काही दिवस वाट बघायचे ठरवले आहे. पोलिसांना आशा आहे की आणखी काही बायका पुढे येऊन तो आपला पती असल्याचा दावा करतील.

मृत पवन कुमार हा रविदास बस्ती येथे रहात होता. तो व्यवसायाने ड्रायव्हर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने रविवारी रात्री विष प्राशन केले. त्याला त्याच्या पत्नीने बेशुद्ध अवस्थेत नजीकच्या हॉस्पिटलमध्ये आणले. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचे प्राण गेले.

- Advertisement -

पोलिसांनी केलेल्या तपासात पवन कुमार हा आर्थिक अडचणीत सापडल होता. त्याला फारसे मित्र नव्हते. तसेच तो साधे आयुष्य जगत होता. त्याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकलेले नाही. ज्या स्त्रीने त्याला हॉस्पिटलमध्ये आणले ती स्वत:ला पवन कुमारची पत्नी म्हणून घेत होती. पोलिसांनी पवनकुमारचे शव ऑटोप्सीसाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. त्याच्या बँक अकाऊंटमध्ये एकही पैसा नाही तसेच तो भाड्याच्या घरात रहात होता.

हेही वाचा –

भाजपचा नाशिक पूर्वचा तिढा वाढला; आमदारांचे समर्थक आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -