घरदेश-विदेशHeat Wave In April : एप्रिलमध्येच जाणवतो कडक उन्हाळा; जाणून घ्या पुढील...

Heat Wave In April : एप्रिलमध्येच जाणवतो कडक उन्हाळा; जाणून घ्या पुढील हवामानाची स्थिती काय?

Subscribe

उत्तर भारतात तापमानाचा पारा झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. त्यामुळे उत्तर पूर्व बिहारमधील लोक वाढत्या उष्णेतेपासून काहीसा दिलासा मिळावा अशी अपेक्षा करत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ईशान्य बिहार आणि तामिळनाडूमधील काही भागात हलका पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर झारखंडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कमाल तापमानात झालेली वाढ झाली आहे. दरम्यान जम्मू, हिमाचल प्रदेश, विदर्भ आणि गुजरातमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. याशिवाय 6 एप्रिल दरम्यान राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली एनसीआर आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट राहील.

सोमवारीही दिल्लीत आकाश निरभ्र राहील. दिवसभरात 20 ते 30 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 39 आणि 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. ९ एप्रिलपर्यंत हवामान कमी-अधिक प्रमाणात असेच राहील. दिल्लीसोबतच एनसीआरमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. तर पंजाबमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. रविवारी बर्नालाचे कमाल तापमान 41 अंशांवर पोहोचले, जे सहसा एप्रिलच्या अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीला होते.

- Advertisement -

पुढील काही दिवस हवामान कोरडे राहील. राज्यातील अनेक शहरांमध्ये पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. हवामान खात्यानुसार दिवसाचे तापमान झपाट्याने वाढेल. हिमाचल प्रदेशात हवामान खात्याने सोमवारी पाच जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कांगडा, कुल्लू, मंडी, सोलन आणि सिरमौरमध्ये उष्णतेची लाट येणार आहे.  हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, राजस्थानमधून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उष्णतेची लाट सुरू आहे. पुढील आठवडाभर राज्यातील हवामानात विशेष बदल होणार नाही.

सध्या उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, विदर्भ, गुजरात, झारखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये कडक उष्मा राहील. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये पावसाची शक्यता आहे. 6 एप्रिल रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या भागात वरच्या वातावरणात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

‘या’ राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम

बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि गुजरातमध्येही पारा चढणार आहे. नैऋत्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा काही भाग, राजस्थान, गुजरातचा काही भाग, छत्तीसगड, झारखंड आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट राहील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बिहारच्या ईशान्य भागात आज अंशतः ढगाळ आकाशासह हलका पाऊस आणि रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधिक तापमानामुळे औरंगाबाद आणि सासाराम येथेही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

राजस्थानमध्ये उष्णतेने मोडला विक्रम

राजस्थानमध्ये उष्णतेमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेकजण आजारी पडले आहेत. अलम म्हणजे बाडमेरमध्ये कमाल तापमान 45.5 अंशांवर पोहोचले आहे, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. त्याचवेळी शेखावतीतही पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. कोटा, बारमेर, वनस्थली, पिलानी, सीकर, जैसलमेर, जोधपूर, फलोदी, बिकानेर, श्री गंगानगर, चुरू येथे उष्णतेची लाट राहील.

‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांचा गडगडाट

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या जोरदार नैऋत्य वाऱ्यांमुळे पुढील पाच दिवस अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल. आज पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या उत्तरेकडील भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयातही 5 एप्रिलला मुसळधार पाऊस पडेल. त्याच वेळी, पुढील 5 दिवसात तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात हलक्या पावसाची शक्यता आहे.


Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड; दोन AK-47 रायफल जप्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -