विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या कोविड-१९ च्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था अंतिम परीक्षा घेऊ शकतात, असं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना लिहिलेल्या पत्रात गृह मंत्रालयाने आज विद्यापीठे आणि संस्थांना परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.” गृहमंत्रालयाने जारी केलेल्या पत्रानुसार अंतिम सेमिस्टरची परीक्षा सक्तीची असेल आणि यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही परीक्षा घेण्यात येईल. तसेच आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) चेही पालन केले जाईल. राज्यातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे राज्य सरकारने विद्यापीठातील पदवीच्या अंतिम परीक्षा रद्द केल्या असतानच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी दिल्याने आता केंद्र सरकारने राज्य सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
MHA, in a letter to Union Higher Education Secy, today permitted conduct of exams by universities&institutions. The final Term Exams are to be compulsorily conducted as per UGC Guidelines and as per the Standard Operating Procedure approved by Union Ministry of Health: MHA pic.twitter.com/mTHWTy0GZ3
— ANI (@ANI) July 6, 2020
विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना अंतिम सत्राच्या परीक्षांमध्ये आधीच्या सेमिस्टर्सची सरासरी काढून गुण दिले जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना तरीही परीक्षा द्यायची आहे त्यांना परीक्षा देण्याची मुभाही सरकारने दिली आहे. यामुळे यंदा अंतिम वर्षाच्या परीक्षा ‘ऐच्छिक’ असणार आहेत. असा निर्णय झालेला असताना आता केंद्र सरकारने पुन्हा परीक्षांची चर्चा सुरु केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परीक्षा घेण्याची परवानगी एका पत्राद्वारे दिल्याने आता पुन्हा परीक्षा संघर्षाची चिन्हे वाढण्याची शक्यता आहे.