घरदेश-विदेशकेंद्र सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ

केंद्र सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ

Subscribe

लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचा निर्धार

 केंद्र सरकारने आदेश दिले तर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेण्यासाठी भारतीय सैन्याची सज्जता आहे, असा निर्धार नवे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी शनिवारी बोलून दाखवला. सरकारच्या आदेशानंतर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पावले उचलण्यात येतील, असे नरवणे म्हणाले.

लष्करप्रमुखपद स्वीकारल्यानंतर प्रथमच नरवणे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरही भारताच्या ताब्यात येऊ शकतो. तशी प्रकारची कारवाई आम्ही करु शकतो, असे नरवणे यांनी म्हटले. सियाचिन भारतासाठी महत्त्वाचा भाग आहे. देशाची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पाकिस्तान आणि चीनच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे तयार आहे, असेही लष्करप्रमुख नरवणे यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

भारतीय सेना आधीच्या तुलनेत आता खूप बलाढ्य झाली आहे. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालींवर भारतीय सेनेची करडी नजर असते. पाकिस्तानच्या कुरापतींवर योग्य ती कारवाई करण्यात भारताला यश येत आहे, अशी माहिती लष्करप्रमुखांनी दिली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफमुळे भारतीय सेना आणखी मजबूत होईल. भूदल, नौदल आणि हवाई दल या तिन्हीमध्ये ताळमेळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही भविष्यातील आव्हाने आणि संकटे यांचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करू शकतो. प्राथमिकतेनुसार अर्थपुरवठ्याची तरतूद करून त्याचे योग्य नियोजन करु शकतो, असे नरवणे यांनी सांगितले. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी 1 जानेवारी रोजी भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. ते देशाचे 28 वे लष्करप्रमुख आहेत. जनरल बिपिन रावत यांची केंद्र सरकारकडून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफपदी निवड करण्यात आली. त्यांच्याजागी मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -