घरदेश-विदेशपळून जाऊन दुसरं लग्न केलं म्हणून जिवंत जाळलं!

पळून जाऊन दुसरं लग्न केलं म्हणून जिवंत जाळलं!

Subscribe

लग्नाची पहिली बायको सोडून गावातील दुसऱ्या विवाहित महिलेशी प्रेम प्रकरण करुन पळून जाऊन लग्न केल्यामुळे ही हत्या झाली आहे.

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यात एका पुरुषाला त्याच्या पहिल्या बायकोच्या माहेरच्यांनी रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. लग्नाची पहिली बायको सोडून गावातील दुसऱ्या विवाहित महिलेशी प्रेम प्रकरण करुन पळून जाऊन लग्न केल्यामुळे ही हत्या झाली आहे. दुसरं लग्न करुन हा तरुण आपल्या दुसऱ्या पत्नी समवेत गावात आला होता. त्याने गावाच्या पंचायतीकडे गावात परत राहण्याची विनंती केली होती. परंतु, गावच्या पंचायतीने निर्णय सांगण्यापूर्वीच त्याची हत्या करण्यात आली.

हेही वाचा – नाशिकमध्ये अनैतिक प्रेमसंबंधातून तीन जणींना जिवंत जाळले

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

बिहारच्या सितामढी जिल्ह्यातील ओरहलिया या गावात मृत तरुण श्रवण महतो राहत होता. काही वर्षांपूर्वी त्याचे एका महिलेशी लग्न केले होते. मात्र, त्याचे गावातील एका कुटुंबातील सुनेसोबत प्रेमसंबंध होते. त्याने आपल्या पहिल्या पत्नीला सोडून दिले आणि तो प्रेमसंबंध असेलल्या गावातील महिलेला पळून घेऊन गेला. त्याने त्या महिलेसोबत दुसरं लग्न केले. काही महिने तो आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत गावाबाहेर राहिला. परंतु, काही दिवसानंतर तो गावात आला. त्याने गावाच्या पंचायतीकडे गावात पुन्हा राहण्याची अनुमती दिली. यावर गावच्या पंचायतीचा निर्णय येण्याअगोदरच श्रवण महतोच्या पहिल्या पत्नीच्या नातोवाईकांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याला बांधून घेतले आणि त्याच्यावर पेट्रोल फेकून त्याला जिवंत जाळण्यात आले. यामध्ये श्रवण ७० टक्के जळाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. श्रवणच्या भावाने सांगितले की, महिलेच्या पहिल्या पतीने श्रवणला बंधून ठेवले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पेट्रोल टाकून त्याला आग लावण्यात आली. पोलिसांनी श्रवणचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी १४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अद्याप कुणालाही अटक केलेले नाही.


हेही वाचा – मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाला जिवंत जाळले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -