देशात आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. तर मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४१ हजार ८३१ नवे कोरोनाबाधित आढळले असून ५४१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३९ हजार २५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी १६ लाख ५५ हजार ८२४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख २४ हजार ३५१ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी ८ लाख २० हजार ५२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ४ लाख १० हजार ९५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
COVID19 | India reports 41,831 new cases, 541 deaths and 39,258 recoveries in the last 24 hours; Recovery Rate currently at 97.36% pic.twitter.com/67a2J7IW7g
— ANI (@ANI) August 1, 2021
गेल्या २४ तासांत ६० लाख १५ हजार ८४२ कोरोना लसीचे डोस देण्यात आले. आतापर्यंत ४७ कोटी २ लाख ९८ हजार ५९६ जणांचे लसीकरण पार पडले आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
COVID19 | Till now, India has administered 47,02,98,596 vaccine doses including 60,15,842 doses administered in the last 24 hours: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/WN1VtJ2oNS
— ANI (@ANI) August 1, 2021
देशात २४ तासांत १७ लाख ८९ हजार ४७२ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत ४६ कोटी ८२ लाख १६ हजार ५१० जणांच्या चाचण्या झाल्या आहेत. दरम्यान मागच्या चार दिवसात कोरोनावर उपचार करणार्यांची संख्या वाढली आहे. दहा राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दहा राज्यांचा आढावा घेतला. केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिसा, आसाम, मिझोरम, मेघालय, आंध्र प्रदेश आणि मणिपूर राज्यातील कोरोना स्थिती जाणून घेतली. तसेच कोरोनाबाबत उपाययोजना करणाच्या सूचना केल्या. ४६ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक आहे. तर ५३ जिल्ह्यांत कोरोना रुग्णवाढीचा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यास सांगितले आहे.