देशात कोरोनाचा हाहा:कार सुरुच आहे. काल देशातील रुग्णसंख्येने ४ लाखांचा टप्पा पार केला. मे महिन्यात देशातील रुग्णसंख्या ४ लाखांहून अधिक नोंदविण्यात येईल असे अंदाज आधीच व्यक्त केले जात होते. कालच्या तुलनेत आज देशाच्या बाधित रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख ६६ हजार १६१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. काल हिच संख्या ४ लाख इतकी होती. ४ लाखांच्या विक्रमी नोंद काल देशात करण्यात आली. गेल्या २४ तासात देशात झालेल्या मृत्यूंची संख्याही कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज देशात ३ हजार ७५४ जणांनी कोरोनामुळे प्राम गमावले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने बळी गेलेल्यांची संख्या २ लाख ४६ हजार २३७ इतकी आहे.
India reports 3,66,161 new #COVID19 cases, 3,53,818 discharges and 3,754 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 2,26,62,575
Total discharges: 1,86,71,222
Death toll: 2,46,116
Active cases: 37,45,237Total vaccination: 17,01,76,603 pic.twitter.com/sjXdpYbVlE
— ANI (@ANI) May 10, 2021
देशातील बाधितांची व कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या पाहिली असता आजच्या तुलनेत काल अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. गेल्या २४ तासात देशात ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत १ कोटी ८६ लाख ७१ हजार २२२ रुग्ण कोरोनामुत्च झाले आहेत. त्याचप्रमाणे आतापर्यत देशात नोंद करण्यात आलेल्या बाधित रुग्णांची संख्या २ कोटी २६ लाख ६२ हजार ५७५ इतकी आहे.
देशात १ मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण केले जात आहे. देशात आतापर्यंत १७ कोटी १ लाख ७६ हजार ६०३ नागरिकांचे लसीकरण करुन पूर्ण झाले आहे. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले असले तरी देशातील रुग्णांचा आकडा ४ लाखांच्या पार गेल्याचे आपण पाहत आहोत. कोरोनाच्या भयानक परिस्थितीवर इंडिया मेडिकल असोसिएशनने (IMA – Indian Medical Association) देशात संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली आहे. झोपेतून जागे व्हा! कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीशी लढण्यासाठी काही कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे IMA ने म्हटले आहे.
हेही वाचा – २०१५ पासून चीनची कोरोना विषाणूच्या निर्मितीची तयार सुरू, ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’चा दावा