घरदेश-विदेशव्रण आणि जखमा भरून निघण्यासाठी विकसित केले नवे तंत्र

व्रण आणि जखमा भरून निघण्यासाठी विकसित केले नवे तंत्र

Subscribe

शरीरावरील व्रण किंवा जखमा भरून काढण्यासाठी भारतीय डॉक्टरांनी नवीन उपचारपद्धतीची निर्मिती केली आहे. सहा महिन्यांच्या उपचारानंतर व्रण ८०% हून अधिक भरून निघणार असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

शरीरावरील व्रण आणि जखमा भरून कढण्यासाठी भारतीय डॉक्टरांनी नवीन तंत्र विकसित केलं आहे. यामुळे आता येत्या काळात शरीरावर पडलेले व्रण जाणार आहे. फेशिअल प्लास्टिक सर्जन डॉ. देबराज शोम आणि त्वचाविकारतज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी गुंतागुंतीचे व्रण आणि शस्त्रक्रियेनंतर झालेलीजखम भरून काढण्यासाठी नवे तंत्र विकसित केले आहे. त्यांचे हे संशोधन अमेरिकन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जनच्या प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. हे संशोधन चेहरा व मानेवरील १-७ इंच रुंदीचे व्रण असलेल्या १०० रुग्णांवर करण्यात आले. या संशोधनाचा कालावधी ६ महिन्यांचा होता तर रुग्णांचा वयोगट १९-४७ होता. या संशोधनात दिसून आले की, ७६% रुग्णांमध्ये बऱ्यापैकी सुधारणा (व्रण आजुबाजूच्या त्वचेमध्ये मिसळून गेला) दिसून आली. सहा महिन्यांच्या उपचारानंतर व्रण ८०% हून अधिक भरून निघाले.

“जखम भरून निघण्यासाठी किंवा व्रण बुजविण्यासाठी विशेषत: आशियाई भारतीय, आफ्रिकन आणि हिस्पॅनिक मूळ असलेल्यांसाठी गेल्या तीन दशकांमध्ये अत्यंत कमी तंत्रांचा शोध लावण्यात आला आहे, हे पाहता या संशोधनाला खूप महत्त्व आहे. व्रण बरे करण्यासाठी आम्ही ज्या क्रांतिकारी पद्धतीने बोटॉक्सचा वापर केला आहे त्या पद्धतीने आजपर्यंत कुणीही वापर केला नव्हता. केलॉइड्ससाठी बोटॉक्सचा वापर करण्यात आला आहे, पण व्रण बरे करण्यासाठी, व्रण रुंद होण्याला प्रतिबंध करण्यासाठी आणि जखम भरून निघण्यासाठी त्याचा वापर केल्याचा कोणताही दाखला मिळत नाही. जगात प्रथमच याचा अशा प्रकारे वापर करण्यात आला आहे. या संशोधनाचा अर्थ हा आहे की ज्यांच्या शरीरातील मेलॅनिनच्या (गडद त्वचेचे पिगमेंट) अस्तित्वाचा परिणाम व्रण भरून निघण्यावर होत असतो त्यांच्या आता शरीरावरील कुठलेही व्रण किंवा जखमा भरून निघू शकतात” – ‘द एस्थेटिक क्लिनिक’चे संचालक डॉ. देबराज शोम

- Advertisement -

अशी असते उपचारपद्धती

या उपचारपद्धतीमध्ये सर्वप्रथम व्रणाभोवती दोन बोटॉक्स इंजक्शन्स देण्यात येतात. त्यानंतर दोन आठवड्यांनी रिव्हिजन सर्जरी (पुनर्शस्त्रक्रिया) करण्यात येते. त्यानंतर पुढील ६ महिने सेंटेनेला एशियाटिका (भारती उपखंडात सापणारी वनौषधी) त्या व्रणावर लावण्यात येते आणि कार्बन डायऑक्साइड लेझर स्कीन रिसरफसिंगची अनेक सत्रे घेण्यात येतात. जखमेनंतर, आधी झालेल्या शस्त्रक्रियांमुळे किंवा भाजणे, अॅसिड अटॅक किंवा फेशिअल ट्रॉमामुळे चेहऱ्यावर व्रण येतात. चेहऱ्यावरील व्रण रुंद असतील तर तो डाग राहतो आणि रुग्ण व शल्यविशारद हे दोघेही निराश होतात. चेहऱ्याच्या स्नायूंची सतत हालचाल होत असते. त्याचा जखम बरी होण्यावर आणि व्रण परिपक्व होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. परिणामी व्रण रुंद होतात अधिक दिसून येतात.बोटॉक्सच्या माध्यमातून चेहऱ्यावरील स्नायूंना तात्पुरते बधीर करून तेथील स्नायूंमुळे जखमांवर येणारा ताण टाळणे ही या तंत्रामागची मूलभूत संकल्पना आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -