घरताज्या घडामोडीजीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज

जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी भारतीय रेल्वे सज्ज

Subscribe

जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी भारतीय रेल्वे धावत आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच भारतातील सर्वात मोठे जाळे असणाऱ्या भारतीय रेल्वेने सर्व प्रवासी वाहतूक २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी अहोरात्र भारतीय रेल्वे काम करत आहे. आतापर्यंत ४४८ माल वाहतूक करणाऱ्या माल गाड्या रेल्वेने सोडल्या आहेत.

करोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे भारतीय रेल्वेने ३१ मार्च २०२० पर्यंत देशभरातील प्रवासी रेल्वे सेवांचे कामकाज स्थगित केले आहे. सध्या भारतीय रेल्वे देशभरात फक्त मालवाहतूक करणाऱ्या गाड्या चालवित आहे. भारतीय रेल्वे आपल्या अखंडित मालवाहतूक सेवांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वे २४ तास काम करत आहे. अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदे, फळे आणि भाज्या, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा इत्यादी वस्तू रेल्वे टर्मिनल्सवर लोड केल्या जात आहेत. विविध राज्यांतील लॉकडाऊनच्या परिस्थिती दरम्यान, देशातील अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी अनेक माल धक्के (गुड्स शेड), स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांवर तैनात असलेले भारतीय रेल्वे कर्मचारी २४ तास सतत कार्यरत आहेत.

आवश्यक वस्तूंसाठी ४७४ रॅकलोड

२३ मार्च २०२० रोजी अन्नधान्य, मीठ, खाद्यतेल, साखर, दूध, फळे आणि भाज्या, कांदा, कोळसा आणि पेट्रोलियम उत्पादने अशा आवश्यक वस्तूंसाठी एकूण ४७४ रॅक लोड करण्यात आले आहेत. दिवसभरात भारतीय रेल्वेने ८९१ रॅक लोड केले ज्यामध्ये लोहाच्या १२१ रॅक, स्टीलचे ४८ रॅक, सिमेंटचे २६ रॅक, खताचे २८ रॅक, कंटेनरचे १०६ रॅक इत्यादी महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे.

- Advertisement -

पार्सलच्या विम्याच्या दरात कपात

राज्य सरकारांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. जेणेकरून कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले विविध निर्बंध लावल्याने जीवनावश्यक वस्तूंचे रॅक कोणत्याही विलंबाशिवाय सहजतेने हाताळले जातील. दरम्याम, भारतीय रेल्वेने ३१ मार्च पर्यंत वस्तूंच्या आणि पार्सलच्या विम्याच्या दरात कपात केली आहे.

वॅगन्स लोड करण्यासाठी किंवा उतरविण्याकरिता नि:शुल्क वेळ आणि रेल्वे परिसरातून माल काढून नेण्यासाठी नि:शुल्क मुदतीत ३१ मार्चपर्यंत निर्धारित नि:शुल्क कालावधीत दुप्पट वाढ करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वे फ्रेट संचालनासाठी नियंत्रण कक्षात तैनात असलेले कर्मचारी, रेल्वे लाइन स्टाफ, देखभाल कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि रेल्वे रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी २४ तास सतत कार्यरत आहेत. या कठीण काळात भारतीय रेल्वे आपली महत्त्वपूर्ण भूमिका समजून घेत असून अत्यावश्यक वस्तूंच जलद लोडींग आणि अनलोडींग सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.


हेही वाचा – ऑलिम्पिकबाबत जपान पंतप्रधान, आयओसी अध्यक्षांत चर्चा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -