देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६१ लाखांच्या पार गेला आहे. गेल्या २४ तासांत ७० हजार ५८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून ७७६ जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत ६१ लाख ४५ हजार २९२ इतके कोरोनाबाधित झाले असून यापैकी ९ लाख ४७ हजार ५७६ इतके अॅक्टिव्ह केसेस आहेत. तसेच आतापर्यंतच्या मृतांचा आकडा ९६ हजार ३१८ इतका झाला आहे. तर ५१ लाख ०१ हजार ३९८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.
India's #COVID19 tally crosses 61-lakh mark with a spike of 70,589 new cases and 776 deaths reported in the last 24 hours.
Case tally stands at 61,45,292 including 9,47,576 active cases, 51,01,398 cured/discharged/migrated & 96,318 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/xc5Jw9Lqav
— ANI (@ANI) September 29, 2020
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहेत. सोमवारी राज्यातील रिकव्हरी वाढला असून तो ७७.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ११ हजार ९२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३ लाख ५१ हजार १५३ वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ३५ हजार ७५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात २४ तासांत १९ हजार ९३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण राज्यातील १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा –
केंद्राने ७२ हजार अमेरिकन रायफल्ससह २२९० कोटी रुपयांच्या शस्त्र खरेदीस दिली मान्यता