घरCORONA UPDATEमजुरांचे स्थलांतर चिंता वाढवणार,कोरोना गावापर्यंत पोहोचणार - पंतप्रधान मोदी

मजुरांचे स्थलांतर चिंता वाढवणार,कोरोना गावापर्यंत पोहोचणार – पंतप्रधान मोदी

Subscribe

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत संवाद साधला.

देशात लॉकडाऊन आहे पण तरीही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश मिळालेलं नाहीये. त्यामुळे राज्या राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाऊन या संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत संवाद साधला. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मजुरांच्या स्थलांतरावर चिंता व्यक्त केली आहे.

मजुरांचं होत असलेलं स्थलांतर साहजिक असलं, तरी यामुळे राज्यांसमोरचं मोठं संकट उभं राहु शकतं. अशी चिंता मोदी यांनी व्यक्त केली. मोदी म्हणाले की, “मी मजुरांची घरी जाण्याची गरज समजू शकतो. लॉकडाउन लागू केल्यानंतर लोकांना जिथे आहेत, तिथेचं थांबावं यावर आपण जोर दिला होता. पण घरी जाणं हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे आपल्याला काही निर्णय बदलावे लागले. आता मजूर गावाकडे जात आहे. आपापल्या घरी पोहोचत आहे. पण, आपल्यासमोर मोठं संकट असणार आहे. कोरोना गावापर्यंत पोहोचणार हे आपल्यासमोरचं आव्हान आहे.

- Advertisement -

व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह जवळपास सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री हजर होते. या बैठकीत देशातील लॉकडाउनसंदर्भात चर्चा सुरू असून, त्यावर सर्व राज्यांच्या भूमिका पंतप्रधान मोदी जाणून घेत आहेत.

या व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या बैठकीत १७ मे नंतर लॉकडाउनसंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो. मुंबई, पुणे, औरंगाबाद,  मालेगाव,  नागपूर यासह इतर हॉटस्पॉट असलेल्या शहरात प्रसार रोखण्यासाठी उपाययोजनांसर्दभात मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केलं.

- Advertisement -

हे ही वाचा – रेल्वेचे तिकीट काढण्यापूर्वी; ‘हे’ नियम वाचा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -