पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जर सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे सोपे होईल, असा दावा केला. या दाव्यानंतर आता काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसविना भाजपला कोणीही पराभूत करू शकत नाही, असा विचार करणे हे केवळ स्वप्न आहे, असं काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी या मुंबई दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. तसंच, बुधवारी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीआधी त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माध्यांशी संवाद साधला. यावेळी टीएमसी महाराष्ट्रात सक्रिय होणार नाही. आम्ही महाराष्ट्रात येणार नाही. मात्र, जिथं जिथं प्रादेशिक पक्ष चांगलं काम करत आहेत. ज्या राज्यात प्रादेशिक पक्ष भाजपसमोर ताकदीने उभे राहत आहेत. त्या ठिकाणी आम्ही ताकदीनं उभे राहणार आहोत, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय राजकारणातील वास्तव सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसशिवाय भाजपला कोणीही पराभूत करू शकत नाही, असा विचार करणे हे केवळ स्वप्न आहे, असं काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले.
Everybody knows the reality of Indian politics. Thinking that without Congress anybody can defeat BJP is merely a dream: Congress General Secretary KC Venugopal https://t.co/leu50rcfNj pic.twitter.com/xlAqoHUDkr
— ANI (@ANI) December 1, 2021