मुंबईत गेल्या २४ तासांत ८०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा २ लाख ५२ हजार ८८८वर पोहोचला आहे. तसेच यापैकी आतापर्यंत १० हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
#CoronavirusUpdates
27-Oct, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/kMT3XO3YmY— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) October 27, 2020
राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ३६३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ११५ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ५४ हजार २८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ४६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा
आज रात्री १० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांशी संवाद साधणार आहेत.
देशातील आता रिकव्हरी रेट ९०.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. रिकव्हरी रेट सातत्याने वाढत असल्यामुळे देशात चांगली चिन्ह दिसत आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
Recovery Rate is now at 90.62% in the country, it is constantly increasing which is a good sign: Rajesh Bhushan, Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/pg3rCIUW9H
— ANI (@ANI) October 27, 2020
मराठा आरक्षणाबाबत सरकार पळ का काढतंय?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
मराठा आरक्षणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणासाठी हे सरकार गंभीर नाही असा आरोप चंद्रकांत सपाटील यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही, असा संतप्त सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. (सविस्तर वाचा)
Corona : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची लागण
मराठा आरक्षणाची सुनावणी काही काळासाठी तहकूब करण्यात आली. मराठा आरक्षणाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार होती. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच ही सुनावणी पार पडणार होती. राज्यात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर असणारी नाराजी तसेच आरोप-प्रत्यारोप होत असताना होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांच लक्ष लागले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याला कोरोना संसर्ग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना कोरोना संसर्ग झाला आहे. तटकरे यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. (सविस्तर वाचा)
देशात ३६,४६९ नव्या कोरोना रूग्णांचे निदान
देशात कोरोनाचा कहर कमी होताना दिसतोय. भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण ७९ लाखांहून अधिक लोकांना झालेली असली तरी १ लाख १९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह या आजाराने सावरणाऱ्यांची संख्याही सतत वाढत आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ३६ हजार ४६९ नवीन रुग्ण आढळले आहेत तर यावेळी ४८८ लोक या जीवघेण्या विषाणूचे बळी ठरले आहेत. (सविस्तर वाचा)
With 36,469 new #COVID19 infections, India's total cases surge to 79,46,429. With 488 new deaths, toll mounts to 1,19,502.
Total active cases are 6,25,857 after a decrease of 27,860 in last 24 hrs
Total cured cases are 72,01,070 with 63,842 new discharges in last 24 hrs pic.twitter.com/YYENxUZlay
— ANI (@ANI) October 27, 2020
पाकिस्तानातील पेशावरमध्ये IED चा स्फोट; ७ जणांचा मृत्यू तर ७० जखमी
A blast has been reported in Peshawar’s Dir Colony, according to police: Pakistan media
— ANI (@ANI) October 27, 2020
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सांगली जिल्ह्यातील तब्बल १०६ एसटी कामगारांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात चालक आणि वाहकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सांगली विभागातून बेस्ट उपक्रमासाठी काही कामगार हे मुंबईला गेले होते. त्यानंतरच या सर्वांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती मिळतेय. सांगलीमधील १०६ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याने एसटी प्रशासनाची धाकधूक अधिकच वाढली आहे. (सविस्तर वाचा)
राज्यात आतापर्यंत १४,७०,६६० रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज नव्या रुग्णसंख्येत सर्वाधिक घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३ हजार ६४५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ४८ हजार ६६५वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४३ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. सोमवारी दिवसभरात राज्यातील ९ हजार ९०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १४ लाख ७० हजार ६६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२ टक्के एवढे झाले आहे.
मराठा आरक्षण प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
मराठा आरक्षण प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज १२ वाजता होणार सुनावणी होणार असून मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतरची ही पहिली सुनावणी असणार आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होतंय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आरक्षणाला स्थगिती देताना हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे देण्यात आले होते. पण आज होणारी सुनावणी ज्या खंडपीठाने स्थगिती दिली, त्याच नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होणार आहे.