घरदेश-विदेशशिवसेनेच्या आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्या, त्यांचा योग्य पाहुणचार करू - ममता...

शिवसेनेच्या आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्या, त्यांचा योग्य पाहुणचार करू – ममता बॅनर्जी

Subscribe

आसाममधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेना आमदारांना पश्चिम बंगालला पाठव, त्यांचा योग्य पाहुणचार करु सा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला लगावला आहे. सत्तेचा गैरवापर करुन भाजपने महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्रातील उद्भवलेल्या राजकीय स्थितीवर त्यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले.

एक दिवस तुम्हालाही सत्तेतून पायउतार व्हावे लागेल –

- Advertisement -

असैंविधानिक मार्गाने भाजपकडून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज भाजप सत्तेत आहे, त्यांच्याकडे अधिकार आणि पैसा आहे. भाजपकडून पैसा, सत्ता आणि माफियांचा वापर करुन पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हे जे काही सुरू आहे ते चुकीचे आहे. मात्र, एक दिवस तुम्हालाही सत्तेतून पायउतार व्हावे लागेल. त्यावेळी तुमचाही पक्ष कोणीतरी फोडेल. आसाममधल्या हॉटेलमध्ये असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवून द्या, त्यांचा योग्य पाहुणचार करू, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

भाजपकडून अर्थिक रसद पुरवली जात आहे –

- Advertisement -

आसाममध्ये पूरस्थिती असताना महाराष्ट्रातल्या आमदारांना तिकडे पाठवण्यात आले. त्या ठिकाणच्या लोकांचा भाजप विचार करत नाही असे ममता बॅनर्जी म्हणाल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करून 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दाव केला आहे. यामागे भाजप असून या बंडखोर गटाला भाजपकडून अर्थिक रसद पुरवली जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -