गेल्या कित्येक दिवसांपासून तनुश्री दत्ताने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लावलेल्या छेडछाडीच्या आरोपवर चर्चा रंगत आहेत. या चर्चेत राखी सावंतनेही हस्तक्षेप करत तनुश्रीला खोटारडी म्हटलंय. तर काही सेलिब्रिटींनी तनुश्रीची बाजू घेत या विषयावर आपले मत मांडले. मात्र आता केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी आता तनुश्रीच्या विषयावर वक्तव्य केले आहे.
Harassment of any kind will not be tolerated. We were the first govt to start ‘SHe Box’ on social media & women who wrote to us saying they are harassed, we took action immediately: Union Minister Maneka Gandhi #TanushreeDutta pic.twitter.com/3sYDqVr52b
— ANI (@ANI) October 2, 2018
काय म्हणाल्या मनेका गांधी
देशात कोणताही छेडछाडीचा प्रकार दुर्लक्षित केला जाणार नाही. आमच्या सरकारने या पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून शी बॉक्स हे कॅम्पेन सुरू केले. यामध्ये पीडित महिला आपली व्यथा मांडू शकते. त्यानुसार त्वरीत कारवाईचे पाऊल उचलले जाईल.
I feel we should also start something called ‘Me Too India’ in which any woman who has been harassed at any point should write to us&we should investigate. For the first time NCW is going into every case complained to us&we go in detail: Union Min Maneka Gandhi #TanushreeDutta pic.twitter.com/iCcleMc4ew
— ANI (@ANI) October 2, 2018
मी टु भारत कॅम्पेन सुरू राहावे
अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या प्रकरणावरून मनेका गांधी यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी महिलांच्या होणाऱ्या अत्याचाराबाबत वक्तव्य केले. तसेच महिलांच्या शोषणासंदर्भात आवाज उठवणे आवश्यक असून मी टु भारत हे कॅम्पेन सुरू राहायला हवे, असेही त्या म्हणाल्या.