भारताने आज ओरिसा येथील बालासोरच्या किनारी भागात जमीनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले. भारतीय सैन्याच्या संरक्षण प्रणालीतील एक महत्वपूर्ण अशा सिस्टिमचा हे क्षेपणास्त्र भाग झाले आहे. या मिसाइलने मोठे अंतर पार करत आपले लक्ष्य भेदले. भारताच्या डीआरडीओने ही माहिती देऊ केली आहे. याआधीही २३ मार्चला अंदमान आणि निकोबार बेटाच्या ठिकाणी अशाच प्रकारचे एक परीक्षण करण्यात आले होते. याठिकाणी भारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइलचे परीक्षण केले होते. या मिसाइलनेही थेट आपले लक्ष्य भेदले होते. त्यानंतर एयर चीफ मार्शल वीआर चौधरी यांनीही या कामगिरीसाठी भारतीय सैन्याचे कौतुक केले होते.
भारत गेल्या काही दिवसांपासून आपल्या संरक्षण दलाच्या क्षेत्रात सातत्याने विस्तार करत आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होणे हेच लक्ष्य भारताने ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षात भारताने ११ हजार ६०७ कोटी रूपयांच्या शस्त्रांत्रांची खरेदी निर्यात केली आहे. राज्य मंत्री अजय भट्ट यांनीच ही माहिती काही दिवसांपूर्वी देऊ केली होती. भारताने २०११ ते २०२० या कालावधीत आपल्या संरक्षण विभागाचे बजेट हे ७६ टक्क्यांनी वाढवले आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इंस्टिट्यूट (SIPRI) च्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रणाली ?
मिडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल (MRSAM) या क्षेपणास्त्राची चाचणी आज ओरिसा येथे सकाली १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. अवकाशातील झेपावलेले लक्ष्य भेदण्याची जबाबदारी या मिसाईलला देण्यात आली होती. त्यानुसार अचूक अशा पद्धतीने लक्ष्य भेदण्यात यश आल्याची माहिती डीआरडीओ मार्फत देण्यात आली.